शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

पवित्र पोर्टलवरून ‘कला’ विषय हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 6:24 AM

कलाशिक्षकांनाही वगळले; कलेचा वारसा संकटात; शाळांमधूनकलावंत घडणार कसे?

- संदीप भालेराव नाशिक : राज्य शासनाने शिक्षकांची शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता तसेच विषय निश्चित करणारा आदेश काढताना या आदेशातून शाळांमधून शिकविला जाणारा कलाविषय आणि कला शिक्षकांनाही वगळण्यात आल्याने शाळास्तरावर कलासंस्कृतीचे बीजे रुजणार कशी? असा प्रश्न शासनाला विचारला जात आहे.७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आदेश काढून पवित्र पोर्टलवरून शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा केला आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तसेच विषय निश्चित करणाऱ्या या आदेशातून मात्र कलाशिक्षक व कला विषय यांना हद्दपार करण्याचा अजबच निर्णय शासनाने घेतल्याने राज्यातील कलाशिक्षकांच्या नोकऱ्यांचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.गेली अनेक वर्षे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गामधून कला हा विषय शिकविण्यात येतो. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय असतानाही शैक्षणिक अर्हतेतून हा विषय वगळण्यात आल्यामुळे कलाशिक्षकांच्या कलेचा आणि विद्यार्थ्यांना कला शिकण्याचा मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.चित्रकला, हस्तकला आणि कार्यानुभवातून विद्यार्थी कलेच्या सानिध्यात जाऊन कलेप्रती त्याची ओढ निर्माण होती. त्यामुळेच आजवर हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होता. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा कला विषय वगळल्याने कलाशिक्षकांवर अन्याय तर होणार आहेच, शिवाय विद्यार्थ्यांना कला विषयापासून वंचित राहावे लागणार आहे. एकीकडे शाळास्तरावर एलिमेंटरी, इंटरमिजिएटसारख्या कलेच्या परीक्षा घेतल्या जातात. दुसरीकडे कलावंतांची प्रक्रियाच बंद करण्याचे घाटत आहे. जे. जे. आर्टसारख्या नामवंत संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी शालेय जीवनातील कलेची पायरी महत्त्वाची ठरते.प्रसंगी न्यायालयात लढा देऊसमृद्ध कलेचा वारसा देशाला लाभलेला आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून तर संवादाचे माध्यम म्हणूनही कलेला महत्त्व होते, परंतु आता कला विषयालाच बाद करण्याचे घाटत असेल, तर हा फार मोठा आत्मघात ठरेल. सनदशीर मार्गाने शासनापर्यंत भूमिका मांडली जाणार आहे. एवढे करूनही न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यावाचून पर्याय राहणार नाही. कला जगविणे आणि रुजविण्यासाठी न्यायालयात लढावेच लागेल.- दत्तात्रय सांगळे, जिल्हाध्यक्ष, विभागीय कला शिक्षक संघ

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducationशिक्षण