शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

अर्जुन खोतकर जाणार विधान परिषदेवर ? गोरंट्याल यांचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 10:48 IST

विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - राज्यात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत यावेळी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते माजी आमदार कैलाश गौरंट्याल यांच्यातील जालन्याची लढत राज्यात लक्षवेधी ठरते. गेल्यावेळी केवळ २९६ मतांच्या फरकाने खोतकर निवडून आले होते. मात्र यावेळी खोतकर विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चांमुळे गोरंट्याल यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार, अशी चर्चा जालना मतदार संघात सुरू आहे. 

जालना, औरंगाबाद विधान परिषद जागेवरील उमेदवार काँग्रेसनेते सुभाष झांबड यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेनेकडून या जागेसाठी अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. मात्र विधान परिषदेच्या या जागेला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लाभली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्जुन खोतकर यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. त्यावेळी खोतकर काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकर यांनी माघार घेतली. विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

खोतकरांसाठी विधानसभा खडतरच

जालना विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेत अत्यंत चुरशीची ठरते. २००९ मध्ये कैलाश गोरंट्याल या मतदार संघातून आमदार होते. त्यावेळी खोतकर यांनी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, २०१४ मध्ये खोतकर पुन्हा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी जेमतेम २९६ मतांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. यावेळी स्थिती वेगळी असून खोतकरच विधान परिषदेवर जाणार या चर्चेमुळे गोरट्याल यांच्यासमोर विधानसभेला शिवसेनेचे की, भाजपचे आव्हान राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.