शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अर्जुन खोतकर जाणार विधान परिषदेवर ? गोरंट्याल यांचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 10:48 IST

विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - राज्यात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत यावेळी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते माजी आमदार कैलाश गौरंट्याल यांच्यातील जालन्याची लढत राज्यात लक्षवेधी ठरते. गेल्यावेळी केवळ २९६ मतांच्या फरकाने खोतकर निवडून आले होते. मात्र यावेळी खोतकर विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चांमुळे गोरंट्याल यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार, अशी चर्चा जालना मतदार संघात सुरू आहे. 

जालना, औरंगाबाद विधान परिषद जागेवरील उमेदवार काँग्रेसनेते सुभाष झांबड यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेनेकडून या जागेसाठी अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. मात्र विधान परिषदेच्या या जागेला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लाभली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्जुन खोतकर यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. त्यावेळी खोतकर काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकर यांनी माघार घेतली. विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

खोतकरांसाठी विधानसभा खडतरच

जालना विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेत अत्यंत चुरशीची ठरते. २००९ मध्ये कैलाश गोरंट्याल या मतदार संघातून आमदार होते. त्यावेळी खोतकर यांनी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, २०१४ मध्ये खोतकर पुन्हा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी जेमतेम २९६ मतांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. यावेळी स्थिती वेगळी असून खोतकरच विधान परिषदेवर जाणार या चर्चेमुळे गोरट्याल यांच्यासमोर विधानसभेला शिवसेनेचे की, भाजपचे आव्हान राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.