शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अर्जुन खोतकर जाणार विधान परिषदेवर ? गोरंट्याल यांचा मार्ग सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 10:48 IST

विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - राज्यात चुरशीच्या लढतींपैकी एक असलेली जालना विधानसभा मतदार संघातील लढत यावेळी होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसनेते माजी आमदार कैलाश गौरंट्याल यांच्यातील जालन्याची लढत राज्यात लक्षवेधी ठरते. गेल्यावेळी केवळ २९६ मतांच्या फरकाने खोतकर निवडून आले होते. मात्र यावेळी खोतकर विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चांमुळे गोरंट्याल यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार, अशी चर्चा जालना मतदार संघात सुरू आहे. 

जालना, औरंगाबाद विधान परिषद जागेवरील उमेदवार काँग्रेसनेते सुभाष झांबड यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेनेकडून या जागेसाठी अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. मात्र विधान परिषदेच्या या जागेला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लाभली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्जुन खोतकर यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. त्यावेळी खोतकर काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकर यांनी माघार घेतली. विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात येते.

खोतकरांसाठी विधानसभा खडतरच

जालना विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि शिवसेनेत अत्यंत चुरशीची ठरते. २००९ मध्ये कैलाश गोरंट्याल या मतदार संघातून आमदार होते. त्यावेळी खोतकर यांनी घनसावंगी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, २०१४ मध्ये खोतकर पुन्हा जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी जेमतेम २९६ मतांनी गोरंट्याल यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. यावेळी स्थिती वेगळी असून खोतकरच विधान परिषदेवर जाणार या चर्चेमुळे गोरट्याल यांच्यासमोर विधानसभेला शिवसेनेचे की, भाजपचे आव्हान राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.