शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच

By संतोष आंधळे | Updated: September 12, 2022 08:51 IST

सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  

कोरोना महासाथीसारखा महाभयंकर काळ पाहिल्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कमालीचा बदल होईल असे अपेक्षित होते. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरली जाणार, अशी घोषणा करून मोठी वाहवा मिळविली होती. आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागातील १७,१०५ पदे अद्यापही रिक्त आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विविध विभागांचा अतिरिक्त कार्यभार, तर काही राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांची पदे आजही रिक्तच आहेत. कोरोनासारखे अनेक आजार भविष्यात येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.  

रिक्त पदांची संख्या लक्षणीयसार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  सहा सहसंचालक पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. उपसंचालकाची एकूण २४ पदे आहेत, त्यापैकी ८ पदे महिनाभरापूर्वीच भरली आहेत. त्यापैकी काही जण ६-७ महिन्यांत निवृत्तीच्या वाटेवर आहेत, तर आणखी  १२ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक अशी अनेक महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. कार्यालयीन आणि प्रशासकीय कामासाठी लागणारी रिक्त पदांची संख्याही लक्षणीय आहे.  

आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात सक्षमपणे लढणारा हा विभाग कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पांगळा झाला आहे. आरोग्य विभागाचे यामधील सर्वांत मोठे अपयश म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या नियोजनाची कमतरता येथे जाणवते. योग्य वेळेवर पदोन्नती नाही, त्यामुळे जो अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र आहे तो त्या हक्काच्या पदोन्नतीसाठी फाईल हातात मिरवत मंत्रायलयाच्या चकरा मारून बेजार होतो. लोकांना सोयीनुसार बदल्या दिल्या तर त्या आरोग्य व्यवस्थेला मानवी चेहरा लाभेल. वैद्यकीय अधिकाऱ्यालाच अमानवी पद्धतीने वागणूक दिली तर त्याच्या कामातून तो मानवी वागणूक देईल काय, हा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींचा थेट आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊन गरीब रुग्ण यामध्ये भरडला जातो. अर्थपूर्ण बदल्या थांबल्या आणि योग्य पद्धतीने समुपदेशन करून अधिकाऱ्यांना पोषक वातावरण तयार करून काम करण्यास सांगितले तर ते आवडीने काम करतील, मात्र असे होताना दिसत नाही. या विभागात काही जण वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होतात आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त होतात. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका वेळेवर होऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नसेल तर त्या कर्मचाऱ्याचे कामात  मन कसे रमेल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

... तरच उत्साहाचे वातावरणआरोग्य विभागात सगळेच काही वाईट चालले आहे असे नाही. तो आहे त्या व्यवस्थेत न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र, मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक गोष्टी वेळेत पूर्ण होत नाही. रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश वर्ग हा सार्वजनिक आरोग्य विभागाने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असतो. त्यांना हक्काच्या आधार वाटणाऱ्या या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा दुष्काळ असल्यासारखी आजची परिस्थिती आहे,  तर नव्यानेच या आरोग्य विभागाची धुरा हातात घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना या मरगळलेल्या विभागाचे केवळ लसीकरण करून चालणार नाही तर त्याला बूस्टर डोस देण्याची गरज आहे. त्यामुळे उत्साहाचे आणि आनंदी वातावरण विभागात तयार होऊ शकेल.  

टॅग्स :Mantralayaमंत्रालयHealthआरोग्य