शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या जागा भरायला माणसे नाहीत का?; नोकरी भरतीची केवळ घोषणाच

By संतोष आंधळे | Updated: September 12, 2022 08:51 IST

सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  

कोरोना महासाथीसारखा महाभयंकर काळ पाहिल्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कमालीचा बदल होईल असे अपेक्षित होते. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरली जाणार, अशी घोषणा करून मोठी वाहवा मिळविली होती. आरोग्य व्यवस्थेचा कणा असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागातील १७,१०५ पदे अद्यापही रिक्त आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विविध विभागांचा अतिरिक्त कार्यभार, तर काही राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांची पदे आजही रिक्तच आहेत. कोरोनासारखे अनेक आजार भविष्यात येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.  

रिक्त पदांची संख्या लक्षणीयसार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक पदे आहेत. त्यापैकी एका पदावर सहसंचालकाची वर्णी लावून ते पद भरण्यात आले आहे. अतिरिक्त संचालकपदी अजूनही अधिकारी मिळालेला नाही.  सहा सहसंचालक पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. उपसंचालकाची एकूण २४ पदे आहेत, त्यापैकी ८ पदे महिनाभरापूर्वीच भरली आहेत. त्यापैकी काही जण ६-७ महिन्यांत निवृत्तीच्या वाटेवर आहेत, तर आणखी  १२ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक अशी अनेक महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. कार्यालयीन आणि प्रशासकीय कामासाठी लागणारी रिक्त पदांची संख्याही लक्षणीय आहे.  

आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात सक्षमपणे लढणारा हा विभाग कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पांगळा झाला आहे. आरोग्य विभागाचे यामधील सर्वांत मोठे अपयश म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या नियोजनाची कमतरता येथे जाणवते. योग्य वेळेवर पदोन्नती नाही, त्यामुळे जो अधिकारी पदोन्नतीसाठी पात्र आहे तो त्या हक्काच्या पदोन्नतीसाठी फाईल हातात मिरवत मंत्रायलयाच्या चकरा मारून बेजार होतो. लोकांना सोयीनुसार बदल्या दिल्या तर त्या आरोग्य व्यवस्थेला मानवी चेहरा लाभेल. वैद्यकीय अधिकाऱ्यालाच अमानवी पद्धतीने वागणूक दिली तर त्याच्या कामातून तो मानवी वागणूक देईल काय, हा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींचा थेट आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊन गरीब रुग्ण यामध्ये भरडला जातो. अर्थपूर्ण बदल्या थांबल्या आणि योग्य पद्धतीने समुपदेशन करून अधिकाऱ्यांना पोषक वातावरण तयार करून काम करण्यास सांगितले तर ते आवडीने काम करतील, मात्र असे होताना दिसत नाही. या विभागात काही जण वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होतात आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त होतात. विभागीय पदोन्नती समितीच्या बैठका वेळेवर होऊन पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नसेल तर त्या कर्मचाऱ्याचे कामात  मन कसे रमेल, याचा विचार होणे गरजेचे आहे.

... तरच उत्साहाचे वातावरणआरोग्य विभागात सगळेच काही वाईट चालले आहे असे नाही. तो आहे त्या व्यवस्थेत न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र, मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक गोष्टी वेळेत पूर्ण होत नाही. रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश वर्ग हा सार्वजनिक आरोग्य विभागाने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असतो. त्यांना हक्काच्या आधार वाटणाऱ्या या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा दुष्काळ असल्यासारखी आजची परिस्थिती आहे,  तर नव्यानेच या आरोग्य विभागाची धुरा हातात घेतलेल्या आरोग्यमंत्र्यांना या मरगळलेल्या विभागाचे केवळ लसीकरण करून चालणार नाही तर त्याला बूस्टर डोस देण्याची गरज आहे. त्यामुळे उत्साहाचे आणि आनंदी वातावरण विभागात तयार होऊ शकेल.  

टॅग्स :Mantralayaमंत्रालयHealthआरोग्य