शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

गारपीटग्रस्त शेतकरी गुन्हेगार आहेत का?, अशोक चव्हाण यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 05:53 IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात जसे त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतकºयांच्या हातात पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत.

मुंबई : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात जसे त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतकºयांच्या हातात पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपीटग्रस्त शेतकरी गुन्हेगार आहेत का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.खा. चव्हाण म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातील एकोंडी गावातील शेतीचे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झाल्यावर सरकारी मदत मिळेल या आशेवर शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत होते. पंचनामा करायला आलेल्या अधिकाºयांनी गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकºयांना पिकात उभे करून त्यांच्या हातात नाव लिहिलेली पाटी देऊन गुन्हेगाराप्रमाणे त्यांचे फोटो काढले. पंचनामे करताना या अधिकाºयांनी महिला शेतकºयांच्या हातातही आरोपीसारख्या पाट्या देऊन फोटो काढले. सरकारने ही क्रूर थट्टा चालवली आहे, असे खा. चव्हाण म्हणाले. गारपिटीत मृत्यू झालेली जनावरे पोस्टमार्टम करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन या, असे फर्मान तेथील तलाठ्यांनी आणि अधिकाºयांनी काढले. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यावर जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन ही तुघलकी फर्माने मागे घेऊन संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुलतानी पंचनामे करून सरकार जखमेवर मीठ का चोळते, असा सवालही त्यांनी केला.मराठवाडा आणि विदर्भात गारांचा पाऊस पडून पंधरवडा उलटत नाही तोच आता पुन्हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मेघगर्जनेसह गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २३ फेब्रुवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तर २४ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. गारांच्या पावसाचा इशारा देतानाच २२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २३ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. २४ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईचे आकाश निरभ्र राहील. बुधवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २१ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण