शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसाच्या विश्रांतीने चिंता; ३२९ गावांना टँकरचा आधार; ‘रिमझिम’ने तूर्तास दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 12:03 IST

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? पाहा आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात आजघडीला सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी याचवेळी सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यासमोरील चिंता वाढली असून काही भागात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे सध्या राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

पावसाच्या विश्रांतीमुळे राज्य सरकारनेही नियोजनास सुरुवात केली आहे. यामध्ये विशेषतः पिण्याचे पाणी तसेच गुरांसाठी चाऱ्याचे नियोजन ठेवण्याच्या सूचना कृषी आणि महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. राज्यात ११३.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

१००% पेक्षा जास्त - ६ जिल्हे - ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नांदेड, यवतमाळ.

७५ ते १००% - १३ जिल्हे - रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

५० ते ७५%  - १५ जिल्हे - नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती.

२५ ते ५०% - राज्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत केवळ २५ ते ५० टक्के पाऊस

पिके तरली; पण प्रतीक्षा कायम

पुणे: दीर्घ खंडानंतर तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने बहुतांश पिकांना जीवनदान मिळाले आहे. असे असले तरी धरणांच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ होणार नाही अशीच चिन्हे आहेत. अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  

दडीनंतर आता तडाखा

नागपूर : दाेन आठवड्यांच्या दडीनंतर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. शनिवारी रात्री पूर्व विदर्भातील वर्धा, गडचिराेली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा जाेरदार फटका बसला. या पावसामुळे अनेक भागांतील शेत शिवारात पाणी साचले असून पिकांची नासाडी झाली आहे. काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस