शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

परिचारिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या अनुराधा आठवले यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 18:15 IST

परिचारिकांच्या गणवेषाचे भारतीयकरण, गुलाबी रंग मिळण्यासाठी अनुराधा आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

ठळक मुद्देपरिचारिकांच्या अनेक प्रश्नांबाबत शासन पातळीवर सक्रिय१९६४ मध्ये परिचारिका म्हणून ससून रुग्णालयात रूजू

पुणे : शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या ऑल इंडिया गव्हर्नमेंट फेडरेशन व महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. परिचारिकांच्या गणवेशाचे भारतीयकरण, गुलाबी रंग मिळण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अनेक प्रश्नांबाबत शासन पातळीवर परिचारिकांच्या मागण्यांसाठी सक्रिय होत्या. मागील काही दिवसांपासून त्या मणक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. आठवले या १९६४ मध्ये परिचारिका म्हणून ससून रुग्णालयात रूजू झाल्या होत्या. पुढील दोन वर्षातच त्यांनी परिचारिकांच्या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याआधी त्यांना स्वत:ला पगारी रजेसाठी प्रशासनाकडे भांडावे लागले होते. या घटनाच संघटनेच्या उभारणीसाठी कारणीभुत ठरली. मार्च १९६६ मध्ये त्यांनी संघटनेची पहिली औपचारिक बैठक घेतली. त्यानंतर परिचारिकांच्या हक्कासाठी त्या सातत्याने लढत राहिल्या.संघटनेला १९७५ मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे स्वरूप मिळाले. पुर्वी परिचारिकांसाठी पांढऱ्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा गणवेश होता. हा गणवेश बदलून त्याचे भारतीयकरण करणे तसेच गणवेश गुलाबी रंगाचा करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा यशस्वी ठरला. जवळपास १५ वर्ष त्यांनी याचा पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे विनाकारण बदल्यांचा प्रश्न, संसारी परिचारिकांच्या अडचणी, रजा, तात्पुरत्या स्वरूपातील परिचारिकांचे तोकडे वेतन, रजांचे फायदे, त्यांना सेवेत सामावून घेणे, परिचारिकांना सुरक्षिततेची हमी, एक दिवसाची रात्रपाळी, वेतन वाढीत सुधारणा असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. विविध मागण्यांसाठी त्यांनी शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांना संघटित करून अनेकदा संपाही पुकारला. संघर्षाच्या काळात त्यांना ६६ महिने बिनपगारी राहावे लागले. मागील वर्षी जून महिन्यामध्ये ससून रुग्णालयातील दहा परिचारिकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनानंतरच शासकीय रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी मेस्मा लागु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतले. आठवले यांच्या लढ्यातील हे अखेरचे आंदोलन ठरले.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरGovernmentसरकार