शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा वचक निर्माण करण्यात ठरतोय अपयशी..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 12:31 IST

कुठे कौमार्य चाचणी तर कुठे आंतरजातीय विवाहाचे कारण.. कधी समाजाच्या विरोधात पाऊल टाकले म्हणून विवस्त्र करून विस्तवावरून चालण्याची तर कधी गरम तेलात हात घालण्याची भयानक शिक्षा..यासर्व शिक्षांचा कळस म्हणजे एखाद्या कुटुंबावर टाकण्यात येणारा सामाजिक बहिष्कार....

ठळक मुद्देतक्रारींचा ओघ कायम; पुणे जिल्हयात बहिष्कृत करण्याचे सर्वाधिक प्रकार 

पुणे :  सामाजिक बहिष्कृत कायदा अस्तित्वात आला खरा पण समाजात नेमका वचक कायद्याचा की जात पंचायतीचा हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब म्हणजे सामाजिक बहिष्कृत केल्याच्या तक्रारींमध्ये होणारी सततची वाढ  होय.. त्याच संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडे येणाऱ्या तक्रारींचा ओघ निश्चित चिंताजनक आहे.. 

राज्य शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर करून तो जुलै 2017 मध्ये लागू केला असला तरी तक्रारींचे प्रमाण कमी झालेले नाही. या कायद्याअंतर्गत आजपर्यंत जवळपास 40 तक्रारी दाखल झाल्या असून, बहिष्कृत करण्याचे सर्वाधिक प्रकार पुणे जिल्हयात घडले आहेत. पुण्यातूनच 8 तक्रारी समोर आल्या आहेत. दुर्दैवाने कायद्याबाबत सामान्य जनतेला प्रामुख्याने जात पंचायतीच्या अन्यायाने बाधित समूहांना या कायद्याबाबत माहिती नाही. त्यामुळे शासनाने गावागावात जाऊन कायद्याविषयी प्रबोधन कार्यशाळा घ्याव्यात. तसेच देशातील इतर राज्यातूनही जात पंचायतीच्या विरोधात तक्रारी करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नवीन कायदा मंजूर करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.यावेळी महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, मिलिंद देशमुख, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह अँड रंजना गवांदे, जात पंचायतीला मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि मनीषा महाजन उपस्थित होत्या. चारच दिवसांपूर्वी नगर येथे तिरूमली नंदिवाले समाजाची जात पंचायत बरखास्त करण्यात अंनिसला यश आले. पुणे येथील कंजारभाट समाजातील कौमार्य परीक्षेचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. या पंचांनी तिरूमली नंदिवाले समाजाचा आदर्श घेऊन आपली जात पंचायत बरखास्त करावी व कौमार्य परीक्षा घेणे तात्काळ बंद करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी नुकतीच मंत्रालयात एक बैठक झाली. त्यामध्ये गृहमंत्र्यांनी कौमार्य परीक्षा घेणे हा लैगिंक हिंसाचाराचा मुददा ठरविला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.  मुंबईपासून गतवर्षी सुरू झालेली सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा राज्यव्यापी अंमलबजावणी मोहीम 1 मे 2019 पर्यंत राज्याच्या सर्व 36 जिल्हयात राबविण्यात येणार आहे. तसेच अंनिसतर्फे जातपंचायतीला मूठमाती हे अभियान पुढच्या टप्प्यावर नेण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध जाती समूहातील जाती-पोटजाती अंतर्गत सुरू असलेल्या जात पंचांच्या समांतर न्यायव्यवस्थेला जगासमोर आणले जाणार आहे. तसेच जात पंचांच्या अन्यायकारक निर्णय प्रक्रियेतून केल्या जाणा-या शारीरिक व आर्थिक शिक्षा आणि मानहानीच्या विरोधात कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे. बाधित व्यक्ती आणि कुटुंबियांना नुकसान भरपाई, तात्पुरते संरक्षण व निवारा उपलब्ध करून देण्याकरिता कायद्याच्या नियमांचा मसुदा दीड वर्षांपूर्वीच राज्याच्या गृहखात्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. शासनाने त्याला तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेcommunityसमाजMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती