शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा वचक निर्माण करण्यात ठरतोय अपयशी..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 12:31 IST

कुठे कौमार्य चाचणी तर कुठे आंतरजातीय विवाहाचे कारण.. कधी समाजाच्या विरोधात पाऊल टाकले म्हणून विवस्त्र करून विस्तवावरून चालण्याची तर कधी गरम तेलात हात घालण्याची भयानक शिक्षा..यासर्व शिक्षांचा कळस म्हणजे एखाद्या कुटुंबावर टाकण्यात येणारा सामाजिक बहिष्कार....

ठळक मुद्देतक्रारींचा ओघ कायम; पुणे जिल्हयात बहिष्कृत करण्याचे सर्वाधिक प्रकार 

पुणे :  सामाजिक बहिष्कृत कायदा अस्तित्वात आला खरा पण समाजात नेमका वचक कायद्याचा की जात पंचायतीचा हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब म्हणजे सामाजिक बहिष्कृत केल्याच्या तक्रारींमध्ये होणारी सततची वाढ  होय.. त्याच संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडे येणाऱ्या तक्रारींचा ओघ निश्चित चिंताजनक आहे.. 

राज्य शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर करून तो जुलै 2017 मध्ये लागू केला असला तरी तक्रारींचे प्रमाण कमी झालेले नाही. या कायद्याअंतर्गत आजपर्यंत जवळपास 40 तक्रारी दाखल झाल्या असून, बहिष्कृत करण्याचे सर्वाधिक प्रकार पुणे जिल्हयात घडले आहेत. पुण्यातूनच 8 तक्रारी समोर आल्या आहेत. दुर्दैवाने कायद्याबाबत सामान्य जनतेला प्रामुख्याने जात पंचायतीच्या अन्यायाने बाधित समूहांना या कायद्याबाबत माहिती नाही. त्यामुळे शासनाने गावागावात जाऊन कायद्याविषयी प्रबोधन कार्यशाळा घ्याव्यात. तसेच देशातील इतर राज्यातूनही जात पंचायतीच्या विरोधात तक्रारी करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नवीन कायदा मंजूर करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.यावेळी महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, मिलिंद देशमुख, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह अँड रंजना गवांदे, जात पंचायतीला मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि मनीषा महाजन उपस्थित होत्या. चारच दिवसांपूर्वी नगर येथे तिरूमली नंदिवाले समाजाची जात पंचायत बरखास्त करण्यात अंनिसला यश आले. पुणे येथील कंजारभाट समाजातील कौमार्य परीक्षेचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. या पंचांनी तिरूमली नंदिवाले समाजाचा आदर्श घेऊन आपली जात पंचायत बरखास्त करावी व कौमार्य परीक्षा घेणे तात्काळ बंद करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी नुकतीच मंत्रालयात एक बैठक झाली. त्यामध्ये गृहमंत्र्यांनी कौमार्य परीक्षा घेणे हा लैगिंक हिंसाचाराचा मुददा ठरविला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.  मुंबईपासून गतवर्षी सुरू झालेली सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा राज्यव्यापी अंमलबजावणी मोहीम 1 मे 2019 पर्यंत राज्याच्या सर्व 36 जिल्हयात राबविण्यात येणार आहे. तसेच अंनिसतर्फे जातपंचायतीला मूठमाती हे अभियान पुढच्या टप्प्यावर नेण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध जाती समूहातील जाती-पोटजाती अंतर्गत सुरू असलेल्या जात पंचांच्या समांतर न्यायव्यवस्थेला जगासमोर आणले जाणार आहे. तसेच जात पंचांच्या अन्यायकारक निर्णय प्रक्रियेतून केल्या जाणा-या शारीरिक व आर्थिक शिक्षा आणि मानहानीच्या विरोधात कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे. बाधित व्यक्ती आणि कुटुंबियांना नुकसान भरपाई, तात्पुरते संरक्षण व निवारा उपलब्ध करून देण्याकरिता कायद्याच्या नियमांचा मसुदा दीड वर्षांपूर्वीच राज्याच्या गृहखात्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. शासनाने त्याला तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेcommunityसमाजMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती