शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जातात'; अमोल कोल्हेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:14 IST

शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते.

टोमॅटोला भाव मिळायची संधी मिळाली तर मोदी सरकारने नेपाळमधून टोमॅटो निर्यात केला. कापसाला भाव मिळण्याची संधी मिळाली तर मोदी सरकारने ऑस्ट्रेलियामधून कापूस निर्यात केला, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. 

मोदी सरकारने तूर आणि उडीद आयात करण्याचे धोरण आणखीन लांबवले जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याचा घामाचा मोल मिळणार नाही अशा पद्धतीने ही शेतकरी विरोधी धोरणे ही सातत्याने केंद्रातल्या भाजप सरकारकडून राबवली जातात, असा निशाणा अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारवर साधला. शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते.

खासदार सुप्रिया सुळेंनी देखील यावेळी भाजपावर टीका केली. ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांची घरं व पक्ष फोडायचे पण कांद्याला आणि दुधाला भाव द्यायचे नाही. फक्त पोस्टरबाजी करायची हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच भ्रष्ट जुमला पार्टीचे काम आहे. शेतकऱ्यांबद्दल काहीच त्यांच्या बॅनरवर दिसत नाही, त्यांच्या पोस्टरबाजीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात आपली लढाई आहे, वैयक्तिक आमचा कुणाशीही काहीच संबंध नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

...आम्हाला तेव्हा सभागृहातून बाहेर काढले-

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हे आणि मी मंत्र्यांची भेट घेतली, पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही. म्हणून आम्ही पार्लमेंटमध्ये कांदा घेऊन गेलो, आम्ही काहीही बोललो नाही, निदर्शने, घोषणा असे काही केले नाही. आम्ही सांगितले की, या कांद्यासाठी आम्हाला फक्त दोन मिनिटे बोलायचा वेळ द्या. तेव्हा आम्हाला सांगितले की तुम्ही दोघेही बाहेर जावा, व आम्हाला तिथून बाहेर काढले. सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे करत आहोत, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार