शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

'केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जातात'; अमोल कोल्हेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:14 IST

शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते.

टोमॅटोला भाव मिळायची संधी मिळाली तर मोदी सरकारने नेपाळमधून टोमॅटो निर्यात केला. कापसाला भाव मिळण्याची संधी मिळाली तर मोदी सरकारने ऑस्ट्रेलियामधून कापूस निर्यात केला, अशी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. 

मोदी सरकारने तूर आणि उडीद आयात करण्याचे धोरण आणखीन लांबवले जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याचा घामाचा मोल मिळणार नाही अशा पद्धतीने ही शेतकरी विरोधी धोरणे ही सातत्याने केंद्रातल्या भाजप सरकारकडून राबवली जातात, असा निशाणा अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारवर साधला. शेतकरी आक्रोश मोर्चाची पळसदेव गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते.

खासदार सुप्रिया सुळेंनी देखील यावेळी भाजपावर टीका केली. ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सचा वापर करून लोकांची घरं व पक्ष फोडायचे पण कांद्याला आणि दुधाला भाव द्यायचे नाही. फक्त पोस्टरबाजी करायची हे भारतीय जनता पार्टी म्हणजेच भ्रष्ट जुमला पार्टीचे काम आहे. शेतकऱ्यांबद्दल काहीच त्यांच्या बॅनरवर दिसत नाही, त्यांच्या पोस्टरबाजीमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाले नाही. त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात आपली लढाई आहे, वैयक्तिक आमचा कुणाशीही काहीच संबंध नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

...आम्हाला तेव्हा सभागृहातून बाहेर काढले-

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हे आणि मी मंत्र्यांची भेट घेतली, पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही. म्हणून आम्ही पार्लमेंटमध्ये कांदा घेऊन गेलो, आम्ही काहीही बोललो नाही, निदर्शने, घोषणा असे काही केले नाही. आम्ही सांगितले की, या कांद्यासाठी आम्हाला फक्त दोन मिनिटे बोलायचा वेळ द्या. तेव्हा आम्हाला सांगितले की तुम्ही दोघेही बाहेर जावा, व आम्हाला तिथून बाहेर काढले. सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे करत आहोत, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार