शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:39 IST

Politics chandrkantpatil bjp kolhapur- पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला.

ठळक मुद्देराज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटीलकोल्हापूरात राज्य सरकारवर टीकेची झोड

कोल्हापूर : पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

पाटील यांनी सांगितले, या महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनिल राठोड या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, दुसरे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, तर तिसरे मंत्री आज सायंकाळपर्यंत राजीनामा देतील असे भाकित पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले.

राज्यात कृत्रिम बहुमताचे सरकार सत्तेत आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी मतदान घेतले तर सरकारच्यामागे किती बहुमत आहे दिसून येईल. सचिन वाझे प्रकरणाची मुळे खूप लांबपर्यंत गेली असून एनआयए व एटीएस हे सर्व खोदून काढेल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, दीड वर्षांत एका मंत्र्याचा राजीनामा झाला. एक जाता जाता वाचला व आज, संध्याकाळपर्यंत एका मंत्र्याचा राजीनामा होईल. सरकार कसे चालले आहे हे त्यावरून दिसत आहे.पत्रकारांनी या मंत्र्याचे नाव काय असेल, असे विचारले असता वेट ॲन्ड वॉच असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडीवरुन राज्य् सरकारवर टीका केली. हे प्रकरण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे.

सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझे