शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आणखी २०० रस्त्यांची चौकशी

By admin | Updated: April 27, 2016 06:19 IST

दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील चौकशी पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे़

मुंबई : रस्त्यांच्या चौकशीत सरासरी ५३ टक्के कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यानंतर, दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील चौकशी पुढच्या आठवड्यापासून सुरू होत आहे़ यामध्ये दोनशे रस्त्यांची पाहणी करून कामाचा दर्जा तपासण्यात येणार आहे़ त्यामुळे या घोटाळ्यातून आणखी काही मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे़खड्डेमुक्त मुंबईसाठी अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आऱ श्रीनिवास यांनी साडेसात हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा मास्टर प्लॅन तयार केला होता़ मात्र, या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आल्यानंतर, आयुक्त अजय मेहता यांनी हा मास्टर प्लॅन गेल्या वर्षी रद्द केला़ आॅक्टोबर २०१५ मध्ये महापौर स्नेहल आंबेकर यांच्या मागणीनुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली़ या समितीने ११५ पानांच्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या़ ठेकेदारांचे हित जपण्यासाठी निविदेतील निकषांमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी ठेवण्यात आल्याकडे समितीने लक्ष वेधले़ त्याचबरोबर, ठेकेदार, अधिकारी व थर्ड पार्टी आॅडिटरवर कारवाईची शिफारस करीत तशी प्रक्रियाही सुरू करण्यात आली़ याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चौकशीचा दुसरा टप्पा पुढच्या आठवड्यात सुरू करण्याचा निर्णय झाला़ (प्रतिनिधी)>पहिल्या टप्प्यातील चौकशीतून कारवाईके़ आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन हे ठेकेदार आणि थर्ड पार्टी आॅडिटर एसजीएस आणि आयआरएस या कंपनीला काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे़ रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यात रस्ते व दक्षता खात्यातील अधिकारी अपयशी ठरले आहेत़ या घोटाळ्यात दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता, प्रमुख अभियंता असे मोठ्या प्रमाणात अधिकारी गुंतले आहेत़ सर्वप्रथम रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ मात्र, मुरुडकर यांना नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे़ >विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलच्या घोटाळ्यात सत्ताधारी शिवसेनेचाही हात असण्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे़ या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांचीही चौकशी करण्याची मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आज केली़ रस्त्यांच्या या प्रस्तावांना विरोध केल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी हे प्रस्ताव मंजूर केले़ च्त्यामुळे या घोटाळ्यासाठी ते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला़, तर या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखाकडे सोपविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली आहे़ अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांचीही या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केली आहे़>चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात काय?च्या घोटाळ्यामध्ये ठेकेदारांपासून, अधिकारी व थर्ड पार्टी आॅडिटरही गुंतले असल्याचे पहिल्या टप्प्यातील चौकशीत उजेडात आले़ रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकारी यात गुंतले असल्याने, त्यांची जबाबदारी आता निश्चित करण्यात येणार आहे़च्त्याचबरोबर, आणखी दोनशे रस्त्यांच्या कामांची छाननी होणार आहे़ त्यामुळे सुमारे तीन हजार कोटींच्या या घोटाळ्यातून आणखी काही धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे़ २०१३ ते २०१५ मध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशीही यात होणार आहे़