शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक, ओखीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 23:53 IST

राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत मदत जाहीर केली.

 नागपूर - राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत मदत जाहीर केली. भात उत्पादक शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते २३ हजार २५० रुपये इतकी मदत मिळणार आहे. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये इतकी मदत मिळणार आहे, अशी महिती मंत्री श्री. फुंडकर यांनी दिली.

या मदतीविषयी सविस्तर माहिती देताना मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, कोरडवाहू भात उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये तर पीक विम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण ७ हजार ९७० रुपये मदत मिळेल. बागायत भात पीकास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये तर पीक विम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण १४ हजार ६७० रुपये मदत बागायत भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मिळेल. तसेच नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेसाठी एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये तर विम्यांतर्गत ९ हजार ७५० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण २३ हजार २५० रुपये मदत नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेस मिळेल. भाताच्या नापेर क्षेत्रासाठी पीक विम्यांतर्गत ९ हजार ७५० रुपये मदत देण्यात येईल. धानाला २०० रुपये प्रति क्विंटल बोनस दिला जाईल. हा बोनस ५० क्विंटलच्या मर्यादेत दिला जाईल, अशी घोषणाही मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी केली.

कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३० हजार ८०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३७ हजार ५०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. कापसाची मदत ही २ हेक्टरपर्यंत देण्यात येईल.

ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पिकांच्या नुकसानीबाबतही मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी मदत जाहीर केली. फळ पीकांसाठी एनडीआरएफमार्फत १८ हजार रुपये तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत ९ हजार ते २५ हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. अशी एकुण साधारण ४३ हजार रुपयांपर्यंतची मदत ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पीकांसाठी दिली जाईल. तसेच ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या भाजीपाल्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये इतकी मदत दिली जाईल, असे मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी जाहीर केले. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार