शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक, ओखीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 23:53 IST

राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत मदत जाहीर केली.

 नागपूर - राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानसभेत मदत जाहीर केली. भात उत्पादक शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसानीसाठी प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते २३ हजार २५० रुपये इतकी मदत मिळणार आहे. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये इतकी मदत मिळणार आहे, अशी महिती मंत्री श्री. फुंडकर यांनी दिली.

या मदतीविषयी सविस्तर माहिती देताना मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, कोरडवाहू भात उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये तर पीक विम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण ७ हजार ९७० रुपये मदत मिळेल. बागायत भात पीकास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये तर पीक विम्यांतर्गत १ हजार १७० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण १४ हजार ६७० रुपये मदत बागायत भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मिळेल. तसेच नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेसाठी एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये तर विम्यांतर्गत ९ हजार ७५० रुपये मदत दिली जाईल. अशी एकुण २३ हजार २५० रुपये मदत नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेस मिळेल. भाताच्या नापेर क्षेत्रासाठी पीक विम्यांतर्गत ९ हजार ७५० रुपये मदत देण्यात येईल. धानाला २०० रुपये प्रति क्विंटल बोनस दिला जाईल. हा बोनस ५० क्विंटलच्या मर्यादेत दिला जाईल, अशी घोषणाही मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी केली.

कोरडवाहू कापूस उत्पादकास शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत ६ हजार ८०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३० हजार ८०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १६ हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण ३७ हजार ५०० रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास देण्यात येईल. कापसाची मदत ही २ हेक्टरपर्यंत देण्यात येईल.

ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पिकांच्या नुकसानीबाबतही मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी मदत जाहीर केली. फळ पीकांसाठी एनडीआरएफमार्फत १८ हजार रुपये तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत ९ हजार ते २५ हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. अशी एकुण साधारण ४३ हजार रुपयांपर्यंतची मदत ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पीकांसाठी दिली जाईल. तसेच ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या भाजीपाल्यास एनडीआरएफमार्फत १३ हजार ५०० रुपये इतकी मदत दिली जाईल, असे मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी जाहीर केले. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार