शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

तीन महिन्यांमध्ये वनपट्टे आदिवासींच्या नावे करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 06:33 IST

वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.वनपट्टे नावावर करण्यासह विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लोकसंघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक नेते घोषणा देतच विधान भवनात गेले.राज्यात सुमारे २,३१,००० वनपट्ट्यांची प्रकरणे असून त्यापैकी फक्त १ लाख ३० प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित वनपट्टे तातडीने नावावर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर तीन महिन्यांत प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्य सचिवांची समिती त्याचा आढावा घेईल, असेही ते म्हणाले.वनपट्टे नावे नसल्यामुळे आदिवासींना दुष्काळी भरपाई मिळालेली नाही. त्यांनाही भरपाई मिळावी ही मागणी तत्त्वत: मान्य करत पात्र शेतकºयांना लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.खावटी कर्ज माफ करतानाच भविष्यात ही रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची मागणीही मान्य झाली. पेसा कायद्याबाबत एक महिन्यात आढावा घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. बैठक सकारात्मक झाली तरी सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे प्रतिभा शिंदे म्हणाल्या. त्यामुळे शिष्टमंडळ मुख्य सचिवांकडे गेले. तिथे संध्याकाळी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ आझाद मैदानाकडे रवाना झाले....तर पुन्हा धडक देणारलोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे म्हणाल्या, मोर्चातील शेकडो शेतकरी आजारी पडले. पायाला फोड व अंगात ताप असताना त्यांनी मुंबई गाठली. सरकारवर विश्वास नसला, तरी मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनामुळे आम्ही मुंबई सोडण्याचे ठरवले आहे. लेखी आश्वासन पाळले नाही, तर तीन महिन्यांनी थेट मंत्रालयावर आदिवासी शेतकरी धडक देतील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी