शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

तीन महिन्यांमध्ये वनपट्टे आदिवासींच्या नावे करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 06:33 IST

वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.वनपट्टे नावावर करण्यासह विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लोकसंघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक नेते घोषणा देतच विधान भवनात गेले.राज्यात सुमारे २,३१,००० वनपट्ट्यांची प्रकरणे असून त्यापैकी फक्त १ लाख ३० प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित वनपट्टे तातडीने नावावर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर तीन महिन्यांत प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्य सचिवांची समिती त्याचा आढावा घेईल, असेही ते म्हणाले.वनपट्टे नावे नसल्यामुळे आदिवासींना दुष्काळी भरपाई मिळालेली नाही. त्यांनाही भरपाई मिळावी ही मागणी तत्त्वत: मान्य करत पात्र शेतकºयांना लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.खावटी कर्ज माफ करतानाच भविष्यात ही रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची मागणीही मान्य झाली. पेसा कायद्याबाबत एक महिन्यात आढावा घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. बैठक सकारात्मक झाली तरी सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे प्रतिभा शिंदे म्हणाल्या. त्यामुळे शिष्टमंडळ मुख्य सचिवांकडे गेले. तिथे संध्याकाळी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ आझाद मैदानाकडे रवाना झाले....तर पुन्हा धडक देणारलोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे म्हणाल्या, मोर्चातील शेकडो शेतकरी आजारी पडले. पायाला फोड व अंगात ताप असताना त्यांनी मुंबई गाठली. सरकारवर विश्वास नसला, तरी मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनामुळे आम्ही मुंबई सोडण्याचे ठरवले आहे. लेखी आश्वासन पाळले नाही, तर तीन महिन्यांनी थेट मंत्रालयावर आदिवासी शेतकरी धडक देतील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी