शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांना ‘ते’ विधान भोवणार; अण्णा हजारेंचे सडेतोड उत्तर, मानहानीची नोटीस पाठवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 22:30 IST

Anna Hazare Vs Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांनी काय टीका केली? अण्णा हजारेंनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर देत अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे.

Anna Hazare Vs Jitendra Awhad: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली. या टीकेला अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आंदोलनांपासून काहीसे दूर असल्याचे चित्र आहे. नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवत भाजपच्या काळात त्यांच्यावर शांत बसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर अण्णा हजारे यांचा एक फोटो शेअर करत टीका केली. “ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”, या शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडले. यावर अण्णा हजारे यांनी भाष्य करताना मानहानीचा दावा करणार असल्याचे म्हटले आहे. 

माझ्यामुळे देशातील नागरिकांचे भले झाले

माझ्यामुळे देशाचा वाटोळ झाले नाही. माझ्या आंदोलनामुळे अनेक देशहिताचे कायदे झाले. माझ्यामुळे देशातील नागरिकांचे भले झाले. मी देशभरात फिरत असताना माहिती अधिकार कायद्याबाबत लोक मला चांगल्या प्रतिक्रिया देतात. मात्र अनेक पक्ष कार्यकर्त्यांचे वाटोळे झाले असल्याचे नाकारता येत नाही. काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले, याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी. यावर वकीलांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.

दरम्यान, या आधीही अण्णा हजारेंच्यावर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही आरोप केले होते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यांच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आपली भूमिका जाहीर करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. मणिपूर विषयावरती अख्खा देश जागा झाला आहे, पण त्यावर अण्णा हजारे यानी कोणतीही भूमिका घेतली नाही, एक शब्दही बोलले नाहीत. आम्ही वाट बघत होती अण्णा कधी बोलणार, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक टीका केली होती. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड