शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, मानधनवाढीचा प्रस्ताव तयार; उद्या मुंडे व मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:03 IST

राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव बुधवारी तयार झाला आहे. या प्रस्तावावर महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा झाल्यानंतरच तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

मुंबई : राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव बुधवारी तयार झाला आहे. या प्रस्तावावर महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा झाल्यानंतरच तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मात्र तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले की, महिला व बालविकास विभागाच्या सचिव आणि आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत कृती समितीचे शिष्टमंडळही उपस्थित होते. या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत मानधनवाढीचे आकडे ठरवून प्रस्ताव तयार झाला. या बैठकीत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे नव्हत्या. त्यामुळे शुक्रवारी मुंडे यांच्यासह वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडला जाईल. संबंधित मंत्र्यांच्या मंजुरीनंतर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.मानधनवाढीचा प्रस्ताव तयार असून, दोन दिवसांत मुंडे आणि मुनगंटीवार यांच्याकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री निर्णयाची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.शासन बोझा कसा उचलणार?राज्यातील सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीमुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे ९०० कोटी रुपयांचा बोझा पडणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे....तर त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?मानधनवाढीसाठी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांनी अंगणवाड्यांना कुलूप लावले आहे. शिवाय स्तनदा माता आणि कुपोषित बालकांचा पोषण आहार वाटप आणि आरोग्य सेवाही बंद केल्या आहेत. परिणामी, या आंदोलनात एखाद्या बालकाचा किंवा मातेचा मृत्यू झाल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.कुपोषित मुलांवरून चिखलफेकसरकार चर्चा करत असल्याने अंगणवाडी कर्मचाºयांनी संप मागे घेण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांनीकृती समितीला केले आहे. मानधनवाढीसाठी कुपोषित बालके आणि स्नतदा मातांना कर्मचारी वेठीस धरत असल्याचा आरोप सचिवांनी केला आहे.   मानधनवाढीसाठी कुपोषित बालके आणि स्नतदा मातांना कर्मचारी वेठीस धरत असल्याचा आरोप सचिवांनी केला आहे. मात्र वर्षभरापूर्वीच मंजूर झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी संप करावा लागत असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. मुळात तीन महिन्यांपूर्वीच संपाची नोटीस दिल्यानंतरही शासनाने निर्णय घेतला नाही.त्यामुळे शासनच संपाला जबाबदार असल्याचा प्रत्यारोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे शासन आणि कर्मचाºयांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये कुपोषित मुलांसह स्तनदा मातांचा जीव टांगणीला लागला आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPankaja Mundeपंकजा मुंडेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार