शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

आंध्र, तेलंगणप्रमाणे राज्यात कर्जमाफी कधी?

By admin | Updated: July 17, 2015 00:30 IST

आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असतील तर महाराष्ट्रात कर्जमाफी का नाही, असा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

मुंबई : आंध्र प्रदेश व तेलंगण ही राज्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असतील तर महाराष्ट्रात कर्जमाफी का नाही, असा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता कर्ज काढण्याची सूचनाही त्यांनी केली.शेतकरी आत्महत्या व राज्यातील दुष्काळी परिस्थिती याबाबत सत्ताधारी व विरोधक यांनी मांडलेल्या प्रस्तावरील चर्चेला गुरुवारी सभागृहात सुरुवात झाली. मुंडे यांनी हा प्रस्ताव मांडला. त्या वेळी ते म्हणाले की, या सरकारचा पायगुण चांगला नाही. गेल्या सात महिन्यांत १८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाचे भाव ५० टक्के वाढवू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. प्रत्यक्षात शेतीमालाच्या दरात केवळ ५ टक्के वाढ झाली. कापसाला ६ हजार रुपयांचा दर देण्याकरिता मोर्चे काढणाऱ्यांच्या सरकारच्या काळात ३८०० रुपयांपेक्षा दर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असताना आता कुणाकुणावर ३०२ कलमाखाली गुन्हे दाखल करायचे, असा सवाल मुंडे यांनी केला.यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांकरिता ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र त्यापैकी ४ हजार कोटी रुपयेदेखील शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, असे मुंडे म्हणाले. लाचार होऊन सत्तेत राहायचे आणि कर्जमुक्तीची मागणी करायची, अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका, असा टोला मुंडे यांनी शिवसेनेला लगावला. लक्षावधी शेतकऱ्यांनी मोदींना मोठ्या आशेने मतदान केले आहे.शिपाई, वाहन चालक हवे कशाला?शेतकरी असंघटित आहेत तर राज्य सरकारी कर्मचारी संघटित आहेत. सरकार एक रुपयातील ८२ पैसे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करते. शिपाई, वाहन चालक ही पदे कशाला हवी? आता सातवा वेतन आयोगाचा भार पडणार आहे. सरकारी पदांमधून काही पदे रद्द केल्यास सरकारचे २५ हजार कोटी रुपये वाचतील, असा दावा शेतकरी व कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी केला.