शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

Andheri Bypoll 2022: 'भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, आता शंका घेणे योग्य नाही', शरद पवार स्पष्टचं बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 18:39 IST

Andheri Bypoll 2022: 'भाजपचा निर्णय स्वागतार्ह, याचा मला आनंद आहे.'

मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गट आणने-सामने आले होते. पण, आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आवाहनानंतर भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतली. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच शरद पवार यांनीही भाजपच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. 

अंधेरी पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला.  आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे माघार घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यापाठोपाठ शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. त्यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीची आठवण करुन दिली होती. यानंतर भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार काय म्हणाले?

भाजपने आज अखेरच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली. भाजपच्या माघारीच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण याला योग्य म्हणत आहेत, तर काहीजण या निर्णयावरुन भाजपवर टोला लगावत आहेत. यातच शरद पवार म्हणाले की, "अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. अखेर आज भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा मला आनंद आहे. एकदा त्यांनी माघार घेतली आहे, त्यावर शंका किंवा इतर काही बोलणे योग्य नाही," अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

"मुळात ही पोटनिवडणूक आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नीला जागा मिळणार अशी शक्यता होती. आधी निर्णय घेतला असता तर फायदा झाला असता का, तर निर्णय आता झाला किंवा आधी झाला, यापेक्षा निर्णय घेतला हे महत्त्वाचे आहे," असेही शरद पवार म्हणाले. 

भाजपला पराभव दिसत होता-जयंत पाटीलभाजपच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाElectionनिवडणूकAndheriअंधेरी