शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Video: 'राज ठाकरे मुर्दाबाद...', भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 17:18 IST

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मुंबई:अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, यामुळे मुरजी पटेल यांचे समर्थक नाराज झाले असून, त्यांनी मनसेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

संबंधित बातमी- प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र

पक्षाने अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यामुळे भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्रानंतरच मुरजी पटेल यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, असे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, 'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय' अशी घोषणाबाजी पटेलांचे कार्यकर्ते करत आहेत. 

पक्षाच्या आदेशावर पटेल काय म्हणाले?भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर, पटेल म्हणतात की, मला पक्षाने उमेदवारी दिली होती, आता माघार घ्यायला सांगितली. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने निर्णय सांगताच एका मिनिटाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला आहे, असं मुरजी पटेल म्हणाले.

भाजपला पराभव दिसत होता-जयंत पाटीलभाजपने जाहीर केलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAndheriअंधेरीElectionनिवडणूक