शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अन् रापमची एकही लालपरी धावलीच नाही, बस स्थानकात स्मशान शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:34 IST

एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून रापमच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले.

वर्धा : एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून रापमच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मंगळवारी जिल्ह्यात दुपारपर्यंत एकही बस धावली नाही. याचा नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. 

येत्या काही दिवसात प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास १७ आॅक्टोबर पासून एसटी कामगार बेमुदत संप आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते. शासकीय व इतर क्षेत्रातील कर्मचाºयांपेक्षा एसटी कर्मचाºयांचे वेतन फारच कमी असून ते अल्प वेतनात नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यांना समाधानकारक वेतन देण्यात यावे, १ जुलै २०१६ पासून देय होणारा ७ टक्के वाढीव महागाई भत्ता शासकीय कर्मचाºयांना लागू करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही रा.प. कर्मचाºयांना तो अद्यापही लागू करण्यात आला नाही. रापमच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता लागू करण्यात यावा, कामगारांच्या हिताचा असलेला वेतन करार करण्यास चालढकल करीत होत असून तो करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर संपाला महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस इंटक महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना, विदर्भ एस. टी. कामगार संघटना, संघर्ष ग्रुप आदी संघटनी पाठींबा दिला असून आंदोलनात जिल्ह्यातील एकूण १६६२ कामगार सहभागी झाले होते.

बस स्थानकात स्मशान शांतता

मध्यरात्रीपासून रामपच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सूरू केले. या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची एकही बस जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावर पोहोचली नाही. ऐरवी विद्यार्थी व प्रवाशांनी गजबजून राहणाºया वर्धा बसस्थानकावर आज स्मशान शांतता होती.

विद्यार्थ्यांची झाली गोची

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात परिसरातील गावांमधील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. इतकेच नव्हे तर नोकरीनिमित्तही वर्धेत येणाºयांची संख्या बºयापैकी आहे. परंतु, मंगळवारी रापमच्या कर्मचाºयांच्या संप आंदोलनामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गोची झाली होती.

छोट्या व्यावसायिकांना फटका

जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्री करून अनेक नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, आजच्या संप आंदोलनामुळे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाºयांसह ओटो चालकांना फटका सहन करावा लागला.

टॅग्स :StrikeसंपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसST Strikeएसटी संप