शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अन् रापमची एकही लालपरी धावलीच नाही, बस स्थानकात स्मशान शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:34 IST

एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून रापमच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले.

वर्धा : एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी संबंधीतांना निवेदने दिलीत. परंतु, अद्यापही मागण्यांची पूर्तता न झाल्याचा ठपका ठेवत मंगळवार १७ आॅक्टोबरपासून रापमच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मंगळवारी जिल्ह्यात दुपारपर्यंत एकही बस धावली नाही. याचा नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. 

येत्या काही दिवसात प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास १७ आॅक्टोबर पासून एसटी कामगार बेमुदत संप आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते. शासकीय व इतर क्षेत्रातील कर्मचाºयांपेक्षा एसटी कर्मचाºयांचे वेतन फारच कमी असून ते अल्प वेतनात नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यांना समाधानकारक वेतन देण्यात यावे, १ जुलै २०१६ पासून देय होणारा ७ टक्के वाढीव महागाई भत्ता शासकीय कर्मचाºयांना लागू करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही रा.प. कर्मचाºयांना तो अद्यापही लागू करण्यात आला नाही. रापमच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता लागू करण्यात यावा, कामगारांच्या हिताचा असलेला वेतन करार करण्यास चालढकल करीत होत असून तो करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर संपाला महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस इंटक महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना, विदर्भ एस. टी. कामगार संघटना, संघर्ष ग्रुप आदी संघटनी पाठींबा दिला असून आंदोलनात जिल्ह्यातील एकूण १६६२ कामगार सहभागी झाले होते.

बस स्थानकात स्मशान शांतता

मध्यरात्रीपासून रामपच्या कामगारांनी बेमुदत संप आंदोलन सूरू केले. या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची एकही बस जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावर पोहोचली नाही. ऐरवी विद्यार्थी व प्रवाशांनी गजबजून राहणाºया वर्धा बसस्थानकावर आज स्मशान शांतता होती.

विद्यार्थ्यांची झाली गोची

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात परिसरातील गावांमधील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. इतकेच नव्हे तर नोकरीनिमित्तही वर्धेत येणाºयांची संख्या बºयापैकी आहे. परंतु, मंगळवारी रापमच्या कर्मचाºयांच्या संप आंदोलनामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गोची झाली होती.

छोट्या व्यावसायिकांना फटका

जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्री करून अनेक नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, आजच्या संप आंदोलनामुळे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाºयांसह ओटो चालकांना फटका सहन करावा लागला.

टॅग्स :StrikeसंपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसST Strikeएसटी संप