आणि मुख्यमंत्र्यांनी यादीच समोर ठेवली!
By Admin | Updated: June 29, 2014 00:49 IST2014-06-29T00:49:35+5:302014-06-29T00:49:35+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ‘मदत’ केली नाही,

आणि मुख्यमंत्र्यांनी यादीच समोर ठेवली!
>अतुल कुलकर्णी - मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ‘मदत’ केली नाही, त्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला, असे आक्षेप अनेकांनी आज दिल्लीत घेतल़े त्या वेळी तयारीनिशी गेलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाला कोणती ‘मदत’ केली, याची यादीच अॅन्टोनी यांच्यासमोर ठेवल्याचे सूत्रंनी लोकमतशी बोलताना सांगितले.
निवडणुकीत दारुण पराभव झाला, हे मान्य आह़े पण, ज्यांना मदत केली त्यापैकी अनेक जण आजही आमचा खूप खर्च झाला, आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करा, असे म्हणत आहेत, त्याविषयी काय करायचे ते देखील सांगून टाका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि तशी मदत मागणा:यांचीदेखील यादी त्यांनी वेगळी देऊन टाकली.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी काय करायचे आहे, याची ब्ल्यू प्रिंट, अॅक्शन प्लॅनदेखील सादर केला. काँग्रेस-राष्ट्रवादीने कोणत्या जागा लढवायच्या आहेत, हे तातडीने ठरवा, उमेदवार निश्चित करा आणि त्यांना कामाला लागू द्या, शेवटच्या क्षणार्पयत घोळ घालू नका, असेही त्यांनी सांगितल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले. जे राजकीय निर्णय दिल्लीहून होणो बाकी आहेत, त्यांची यादीदेखील त्यांनी दिली. महामंडळांवर कोणाला नेमायचे ते नेमा, पण तातडीने त्यावरदेखील निर्णय घ्या़ दिल्लीतून होणा:या विलंबाची पावती मात्र आपल्या नावाने फाडली जाते आहे, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. पक्षाने मदत केली नाही, असे आज म्हणणारे स्वत:च्या मतदारसंघाबाहेर किती वेळा गेले, त्यांनी कोणत्या मतदारसंघात किती सभा घेतल्या, याची माहितीदेखील त्यांनी दिली तर खरे चित्र कळेल, असा टोला माणिकराव ठाकरे यांनी लगावल्याचे समजते. एकूणच दिल्लीत झालेली बैठक आणि समोरासमोर झालेली चर्चा म्हणावी तेवढी हसत-खेळत नक्कीच नव्हती. अनेक वेळा शाब्दिक चकमकीदेखील झडल्या. काही वेळा तणावाचे वातावरणदेखील तयार झाले, मात्र बरे झाले, ‘मनातली खळखळ दूर झाली’ अशी प्रतिक्रिया वरीष्ठ एका नेत्याने बोलून दाखवली.