शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“भाजप, PM मोदी अन् CM फडणवीस हे प्रगतीचेच राजकारण करतात”; अमृतावहिनींचा टोला कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:08 IST

Amruta Fadnavis News: शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे अगदी योग्य शब्दांत विश्लेषण केले, याचा आनंद आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

Amruta Fadnavis News: आताच्या घडीला राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण नवी वळणे घेत असून, नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. हे प्रकरण विरोधकांनी चांगलेच लावून धरले असून, आरोप-प्रत्यारोप तीव्र होत आहे. यातच ठाकरे गटाने दिलेला स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीतील धुसपूस यांमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. भाजपाचे शिर्डीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. यातच आता विविध घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांना राज्यातील परिस्थिती आणि वाढत जात असलेले जातीय राजकारण याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, देवेंद्रजी, भाजपा आणि पंतप्रधान मोदी हे प्रगतीचे राजकारण करतात. जातीय राजकारण न करणे आपल्या हातात आहे. त्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

राजकारणातील कट्टर शत्रूही मित्र झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत

ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवत आहे. विधानसभेला फटका बसल्यामुळे या गोष्टी केल्या जात आहेत, असे वाटते का, या प्रश्नावर बोलताना, मला वाटते की, आपल्या नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. वैयक्तिक मनभेद कोणाचे नाहीत. त्यामुळेच राजकारणातील कट्टर शत्रूही मित्र झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. तर पक्के मित्र हे शत्रू झाल्याचे आपण पाहिले आहे. पुन्हा मित्र झाल्याचे पाहिले आहे, असे सूचक विधान अमृता फडणवीस यांनी केले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले होते. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, शरद पवार दिग्गज नेते आहेत. त्यांचे विश्लेषण खूप चांगले असते. शरद पवारांनी अगदी योग्य विश्लेषण केले आहे, याचा मला आनंद आहे. 

 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा