शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजं; पुरुषोत्तम खेडेकरांचा महिलांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 12:25 IST

तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे असं खेडेकर यांनी म्हटलं.

बुलढाणा - समाज हा घडत असतो, ते घडण्याचं केंद्र कुटुंब असते. व्यक्तीपासून कुटुंब आणि कुटुंबापासून समाज तयार होतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती शारिरीक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक अंगाने परिपूर्ण होणार नाही. बालपणापासून मुलगा-मुलगी समानतेने वागवले जाणार नाही. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांमध्ये त्यांची आई फरक करते त्या मुलीनं तक्रार कुणाकडे करायची? दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही अमृता फडणवीसांना रोल मॉडेल मानलं पाहिजे असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. 

पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, हुंडा बाप की माय कोण द्यायला सांगते, तर माय...जास्तीत जास्त बाबी महिलांनी स्वीकारल्या आणि बदलल्या तरच शक्य आहे. बदल हा महिलांच्या रक्तात आहे. किचनमध्ये दिवसाला बदल करत असतात. एवढे बदल वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात करत असता, मग तुम्हाला आवडत असताना तुम्ही का बदलत नाही? साधी टिकली रोज वेगवेगळी बदलली जाते. नवरा बदलू शकत नाही ही तुमची अडसर आहे, मला ते मान्य आहे. नाहीतर तोदेखील बदलला असता.महिलांनी ठरवलं तर समाजात बदल शक्य आहे असं त्यांनी म्हटलं. बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालयातील ताराबाई शिंदे साहित्य नगरीत संमेलनाच्या आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

तसेच ज्या ब्राह्मण समाजातील महिलांनी अन्याय, अत्याचार झुगारून दिले.देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानली पाहिजे. विलासराव-शरद पवारांची पत्नी सोडली तर राजकारणात अमृता फडणवीस आहेत. ज्या देवेंद्र फडणवीस यांना केस कापायला जायचं असेल तर त्यांना विचारून जातात. तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे. हा प्रत्यक्षात आणावा. स्वत:तयार व्हा असंही पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना सांगितले. 

दरम्यान, जग बदलायचं तेव्हा बदलेल, बदलाची सुरुवात सर्वप्रथम कुटुंबाला विश्वासात घेऊन करा. आजही आम्ही बहुसंख्येने असलो तरी विषमतावादी, शौषणवादी, वर्ण वर्चस्ववादी वैदिक साहित्याचे हमाल म्हणूनच ओझे वाहत आहोत. धर्माची दारू, जातीची नशा, परधर्माचा टोकाचा द्वेष आपल्या उंबरठ्याजवळ आलाय अशा वेळी साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी आपली लेखणी झिजवावी असं प्रतिपादनही खेडेकर यांनी संमेलनात केले. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसpurushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकर