शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

तुम्ही तुमचं काम करा, तुमचं काय देणंघेणं?; खासदार नवनीत राणा शिवसेना नेते संजय राऊतांवर भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 16:02 IST

Amravati Violence: ज्याठिकाणी हिंसक आंदोलन झाली तिथं खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात गृहखातं अपयशी ठरलं असं त्यांनी सांगितले.

अमरावती – त्रिपुरा येथील एका कथित घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात काही शहरांमध्ये अशांतता पसरली आहे. अमरावती जिल्ह्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. अमरावतीत मागील २ दिवसांपासून जाळपोळ आणि दगडफेक सुरु आहे. अमरावती बंदची हाक देण्यात आली. अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून सोशल मीडियावरुन काहीही चुकीची अफवा पसरवू नये यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

अमरावतीत सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावरुन स्थानिक खासदार नवनीत राणा कौर भडकल्या आहेत. याबाबत नवनीत राणा म्हणाल्या की, गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाचा आम्ही निषेध केला आहे. अतिरिक्त पोलीस कुमक जिल्ह्यात मागवली गेली आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्याठिकाणी हिंसक आंदोलन झाली तिथं खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात गृहखातं अपयशी ठरलं. गुप्तचर खात्याला त्याची माहिती मिळाली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच अमरावतीत खूप आर्थिक नुकसान झालं आहे. पहिल्यांदाच अमरावतीत असं घडलं आहे. लोकांना मारहाण झाली. विनाकारण काही जणांना याचा फटका बसला आहे. काही राजकीय नेते स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. सरकारने या लोकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. पालकमंत्र्यांनी ज्यारितीने प्रतिक्रिया दिली. काही पक्ष निवडणुकांमुळे हे घडवून आणतायेत. बाकीच्या राज्याच्या निवडणुकांचा अमरावतीशी काय संबंध? असा सवाल नवनीत राणा(Navneet Rana) यांनी विचारला.

त्याचसोबत शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांच्यावरही नवनीत राणांनी टीका केली. ते कोणत्या राज्याचं प्रतिनिधीत्व करतात. कुठे बसला आहात? अमरावतीबद्दल काय बोलताय? काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करा. अमरावती लोकांबद्दल त्यांना काही माहिती नाही. आम्ही बाहेरच्या आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचं निमंत्रण दिलं नाही.  तुम्ही तुमचं काम करा जे तुम्हाला येत नाही. तुम्ही बाहेरचे आहात आमच्या जिल्ह्याबद्दल बोलण्याचा अधिकार दिला नाही. तुम्ही तुमचं काम करा अशा शब्दात खासदारांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. दरम्यान, जो अतिसंवेदनशील भाग आहे तिथे लोकांशी बोलायला चालले आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर ज्या ज्या लोकांचे नुकसान झाले त्याचा आढावा घेऊ त्यानंतर नुकसान भरपाईची मागणी करू असंही नवनीत राणांनी सांगितले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावती