शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:40 IST

नेटकऱ्यांची पसंती, डॉ. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या यात्रेला अधिक दिसत आहे. युवकांमध्ये दोन्ही नेत्यांविषयी असलेली क्रेझ यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आला. या यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा काढला आहे. तर भाजपने देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढली आहे. परंतु, सोशल मीडियावर नुकतीच घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचीच अधिक चर्चा दिसत आहे.

शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीत सेनेला मतदार करणाऱ्या जनतेचे आभार मानण्यास सुरुवात केली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत सेनेला मतदान करावे, असे आवाहन करणार आहेत. परंतु, आदित्य यांनी एका कार्यक्रमात ही यात्रा राजकीय नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या यात्रेविषयी शिवसेनाच गोंधळात आहे, का असा प्रश्न उपस्थित होते. आदित्य यांनी गेल्या महिन्यातच या यात्रेला सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला.

आदित्य ठाकरे यांच्या यात्रेपाठोपाठ, भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात महाजनादेश अर्थात जनतेचा सर्वात मोठा कौल या आशयाखाली यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ हजारहून अधिक किलोमीटर प्रवास करणार आहेत. या यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू होण्याच्या एक दिवसआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक असणार आहे. डॉ. कोल्हे छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर परिचीत आहेत. तर उदयनराजे यांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्यामुळे ही यात्रा चांगलीच गाजणार अशी शक्यता आहे.

सोशल मीडियावर सध्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश, आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या चर्चेत सध्यातरी शिवस्वराज्य यात्राच सर्वाधिक चर्चेत आहे. नेटकऱ्यांची पसंती, डॉ. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या यात्रेला अधिक दिसत आहे. युवकांमध्ये दोन्ही नेत्यांविषयी असलेली क्रेझ यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.