शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
3
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
4
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
6
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
7
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
8
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
9
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
10
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
11
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
12
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
13
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
14
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
15
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 12:42 PM

पक्षातील बाकीचे मला म्हणायचे. तू त्यांना आणलंय, तूच समजावून सांग...राजकारण हा त्यांचा पिंड नाही असा टोला अजित पवारांनी कोल्हेंना लगावला.

मंचर - Ajit Pawar on Amol Kolhe ( Marathi News ) गेल्यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करा हे सांगायला मी इथं आलो होतो. दुसऱ्या पक्षातून त्यांना आमच्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. मी आणि दिलीपरावांनी जबाबदारी घेतली. दिलीपरावांनी जुन्नर, खेड आणि आंबेगावची जबाबदारी घेतली. माझ्यावर भोसरी, शिरुर आणि हडपसर ही जबाबदारी होती. त्याप्रकारे ही जागा निवडून आणली. निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे. दिसायला चांगला आहे. पुढे काहीतरी चांगले काम करेल. पण दोन वर्ष झाली आणि त्यांनी मला म्हटलं दादा, मला राजीनामा द्यायचा आहे असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. 

शिरुर येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी म्हटलं की, अमोल कोल्हे माझ्याकडे आले, त्यांनी मला राजीनामा द्यायचा आहे असं म्हटलं. त्यावर मी बोललो, जनतेनं आपल्याला ५ वर्षासाठी निवडून दिले आणि २ वर्षात राजीनामा दिला तर लोक जोड्याने मारतील. असं करू नका. तुमची अडचण काय असं मी विचारले, तेव्हा दादा मी कलावंत आहे. माझी वेगवेगळी नाटके, सिनेमा आहेत त्यावर परिणाम होतोय असं कोल्हेंनी म्हटलं असं सांगत अजितदादांनी पुढे सांगितले, मी खोटं बोलणार नाही. जे काही समोरासमोर करेन. मी कोल्हेंना म्हटलं असं करू नका. दिसायला खराब दिसते त्यावर कोल्हेंनीही उत्तर दिले. "मी सेलिब्रिटी आहे. लोकांना वाटतं मी रोज मतदारसंघात यावे कसं शक्य आहे? मला माझी मालिका असते, त्याठिकाणी काम करावे लागते. मग ते कोण बघणार? माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असे त्यांचे शब्द होते असं अजित पवारांनी जनतेला सांगितले.

तर पक्षातील बाकीचे मला म्हणायचे. तू त्यांना आणलंय, तूच समजावून सांग...राजकारण हा त्यांचा पिंड नाही. एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर सेलिब्रिटी काढायचे. हेमा मालिनी, सनी देओल, गोविंदा, धर्मेंद्र असे अनेक कलाकार निवडणुकीत उभे राहतात. यांचा राजकारणाची काय संबंध आहे. अमिताभ बच्चन यांनाही एकदा उभे केले होते. शेवटी त्या भागातील विकासकामे करण्याची आवड आहे का हे पाहायला हवे. यात आमचीही चूक आहे. कुणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही असं सांगत अजित पवारांनी कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केल्याचं कबूल केले. 

दरम्यान, शिवजयंतीला मला भेटले, तेव्हा मी विचारले, मागे तुम्ही राजीनामा देण्याची भाषा केली आणि पुन्हा दंड थोपटले. तेव्हा  मला वाटायला लागलं पुन्हा उभं राहावे. असं कसं चालेल, आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिरुरकरांनो, उद्या लोकसभेसाठी कोल्हे पुन्हा येतील, दादांनी सांगितले ते खरे आहे, पण आता मी काम करायचं ठरवलं आहे बोलतील, पण असं अजिबात नाही. जिथे जागा लढवायची आहे तिथे ३-४ दिवस नाटकांचे प्रयोग चाललेत. त्यातून वातावरण निर्मिती चालली आहे. ते तात्पुरते आहे. देशाची हवा मोदींच्या बाजूची आहे ही वस्तूस्थिती आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश हे भाजपाकडे गेलेले आहे. आम्ही एनडीएमध्ये आहोत. प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला आम्ही मदत करतोय. केंद्रात ज्यांचे सरकार येणार त्यांच्या विचारांचा खासदार हवा. विरोधी पक्षातील खासदार निव्वळ विरोध करायला जातात असं अजित पवारांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस