शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक राज्यपालांच्या दारी, काय घडलं?

By प्रविण मरगळे | Updated: March 20, 2025 20:02 IST

विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्यांना सभापती, अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात आहे असा आरोप विरोधकांनी केला.

मुंबई - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमनेसामने येत असल्याचं दिसून आले. त्यातच विरोधकांनी विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या कामकाजाच्या भूमिकेवर आक्षेप घेत थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे पत्र लिहून सभापती राम शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात अंबादास दानवे यांनी म्हटलं की, संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तिथे टीका आणि पर्यायी धोरण सूचविणे आहे. मात्र महाराष्ट्र विधान परिषद आणि विधानसभा सभागृहामध्ये सभापती, अध्यक्ष यांच्याकडून कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य कामकाज चालवले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्यांना सभापती, अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून नियमबाह्य महत्त्वपूर्ण चर्चा करताना विरोधी पक्षाची अडवणूक केली जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही. पुरवणी मागणीच्या चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असं विरोधी पक्षनेते दानवे यांनी म्हटलं.

दरम्यान, सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिव सुद्धा उपस्थित नसतात. खात्याचे राज्यमंत्री असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्‍यांना चर्चेच उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे. अशाप्रकारे विधान परिषदेच्या सभापतींनी सभागृह चालवताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृह चालवताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला आहे त्यामुळे आपण स्वत: लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने राज्यपालांकडे केली आहे. 

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरAmbadas Danweyअंबादास दानवेMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025