शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक राज्यपालांच्या दारी, काय घडलं?

By प्रविण मरगळे | Updated: March 20, 2025 20:02 IST

विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्यांना सभापती, अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात आहे असा आरोप विरोधकांनी केला.

मुंबई - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमनेसामने येत असल्याचं दिसून आले. त्यातच विरोधकांनी विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या कामकाजाच्या भूमिकेवर आक्षेप घेत थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे पत्र लिहून सभापती राम शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात अंबादास दानवे यांनी म्हटलं की, संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तिथे टीका आणि पर्यायी धोरण सूचविणे आहे. मात्र महाराष्ट्र विधान परिषद आणि विधानसभा सभागृहामध्ये सभापती, अध्यक्ष यांच्याकडून कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य कामकाज चालवले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्यांना सभापती, अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून नियमबाह्य महत्त्वपूर्ण चर्चा करताना विरोधी पक्षाची अडवणूक केली जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही. पुरवणी मागणीच्या चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असं विरोधी पक्षनेते दानवे यांनी म्हटलं.

दरम्यान, सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिव सुद्धा उपस्थित नसतात. खात्याचे राज्यमंत्री असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्‍यांना चर्चेच उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे. अशाप्रकारे विधान परिषदेच्या सभापतींनी सभागृह चालवताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृह चालवताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला आहे त्यामुळे आपण स्वत: लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने राज्यपालांकडे केली आहे. 

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरAmbadas Danweyअंबादास दानवेMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025