शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधक राज्यपालांच्या दारी, काय घडलं?

By प्रविण मरगळे | Updated: March 20, 2025 20:02 IST

विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्यांना सभापती, अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात आहे असा आरोप विरोधकांनी केला.

मुंबई - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने आमनेसामने येत असल्याचं दिसून आले. त्यातच विरोधकांनी विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या कामकाजाच्या भूमिकेवर आक्षेप घेत थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे पत्र लिहून सभापती राम शिंदे, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात अंबादास दानवे यांनी म्हटलं की, संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तिथे टीका आणि पर्यायी धोरण सूचविणे आहे. मात्र महाराष्ट्र विधान परिषद आणि विधानसभा सभागृहामध्ये सभापती, अध्यक्ष यांच्याकडून कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य कामकाज चालवले जात आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्यांना सभापती, अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून नियमबाह्य महत्त्वपूर्ण चर्चा करताना विरोधी पक्षाची अडवणूक केली जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही. पुरवणी मागणीच्या चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असं विरोधी पक्षनेते दानवे यांनी म्हटलं.

दरम्यान, सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिव सुद्धा उपस्थित नसतात. खात्याचे राज्यमंत्री असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्‍यांना चर्चेच उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे. अशाप्रकारे विधान परिषदेच्या सभापतींनी सभागृह चालवताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृह चालवताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला आहे त्यामुळे आपण स्वत: लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने राज्यपालांकडे केली आहे. 

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरAmbadas Danweyअंबादास दानवेMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025