शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस देणाऱ्या बँकांना जाळणार; शिवसेना आमदाराची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:51 IST

त्यांच्या या वक्तव्यानंतर बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. विशेष म्हणजे सर्वधिक फटका औरंगाबाद जिल्ह्याला बसला आहे. मात्र असे असताना सुद्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या बाबतीत बँकांच्या वतीने नोटिसा दिल्या जात आहेत. त्यामुळे या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र याचवेळी बँकांचा विरोध करताना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची जीभ घसरली. शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस दिल्यास बँकांसह मॅनेजरलाही जाळून टाकू असे विधान त्यांनी केले.

मराठवाड्यातील सुमारे ७५ लाख एकर जमिनीवरील खरीप हंगामातील तोंडाशी आलेल्या पिकांचा अवकाळी पावसामुळे चिखल झाला आहे. शेतकऱ्यांनी अंदाजे १५ ते २० हजार कोटींच्या आसपास केलेली गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली आहेत.त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र असे असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटीस देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे रविवारी उद्धव ठाकरे यांनी वैजापूर तालुक्यात भेटी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी बँकांच्या कर्ज भरण्याबाबतच्या नोटिसा येत असल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वतीने बँकांच्या कर्जाच्या नोटिसांची होळी करण्यात आली आहे. तर बँकांनी नोटिसा देण्याचे काम तात्काळ थांबवावे. बँकांनी नोटिसा देण्याचे प्रकार थांबवला नाही तर, शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसैनिकांनी दिला आहे. मात्र नोटीस पाठवणाऱ्या बँकांवर टीका करताना दानवे यांची जीभ घसरली.कर्जवसुलीची नोटीस देणाऱ्या बँकांसह मॅनेजरलाही जाळून टाकू असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त झाले असताना बँका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. आधीच शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणणाऱ्या बँकेंच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. खिशात असलेले सर्व पैसे आधीच पिकांच्या पेरणीला लावले आहे. मात्र आता त्याच पिकांची पूर्णपणे नासाडी झाले असताना, बँकांचे कर्ज भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.