शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस देणाऱ्या बँकांना जाळणार; शिवसेना आमदाराची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:51 IST

त्यांच्या या वक्तव्यानंतर बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. विशेष म्हणजे सर्वधिक फटका औरंगाबाद जिल्ह्याला बसला आहे. मात्र असे असताना सुद्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या बाबतीत बँकांच्या वतीने नोटिसा दिल्या जात आहेत. त्यामुळे या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र याचवेळी बँकांचा विरोध करताना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची जीभ घसरली. शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस दिल्यास बँकांसह मॅनेजरलाही जाळून टाकू असे विधान त्यांनी केले.

मराठवाड्यातील सुमारे ७५ लाख एकर जमिनीवरील खरीप हंगामातील तोंडाशी आलेल्या पिकांचा अवकाळी पावसामुळे चिखल झाला आहे. शेतकऱ्यांनी अंदाजे १५ ते २० हजार कोटींच्या आसपास केलेली गुंतवणूक ओल्या दुष्काळामुळे वाया गेली आहेत.त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र असे असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटीस देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे रविवारी उद्धव ठाकरे यांनी वैजापूर तालुक्यात भेटी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी बँकांच्या कर्ज भरण्याबाबतच्या नोटिसा येत असल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वतीने बँकांच्या कर्जाच्या नोटिसांची होळी करण्यात आली आहे. तर बँकांनी नोटिसा देण्याचे काम तात्काळ थांबवावे. बँकांनी नोटिसा देण्याचे प्रकार थांबवला नाही तर, शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसैनिकांनी दिला आहे. मात्र नोटीस पाठवणाऱ्या बँकांवर टीका करताना दानवे यांची जीभ घसरली.कर्जवसुलीची नोटीस देणाऱ्या बँकांसह मॅनेजरलाही जाळून टाकू असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त झाले असताना बँका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. आधीच शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना पुन्हा अडचणीत आणणाऱ्या बँकेंच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. खिशात असलेले सर्व पैसे आधीच पिकांच्या पेरणीला लावले आहे. मात्र आता त्याच पिकांची पूर्णपणे नासाडी झाले असताना, बँकांचे कर्ज भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.