शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav 2025: पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावही वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:38 IST

Ganesh Chaturthi 2025: दीडएक महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी मूर्तिकारांकडून सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीडएक महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी मूर्तिकारांकडून सुरू झाली असून, उच्च न्यायालयाने दिलेल्या पीओपीच्या परवानगीनंतर आता मूर्तीकाम वेगाने सुरू झाले आहे. तत्पूर्वी पीओपीच्या मूर्तीमुळे जल प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊ नये, म्हणून अधिकाधिक छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावांच्या निर्मितीवर भर द्यावा. गणेशोत्सवाची मार्गदर्शन तत्वे जारी करताना या प्रक्रियेमध्ये गणेश मूर्तिकार संघटनांनाही सामावून घ्यावे, असे मूर्तिकारांनी सांगितले.

उच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींना परवानगी दिल्यानंतर मूर्तिकारांनी काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. श्रीगणेश मूर्तिकार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी सांगितले, शासनाने मार्गदर्शक तत्वे तयार करताना मूर्तिकार संघटनांना सहभागी करून घ्यावे. जेणेकरून काही निर्णय घेताना मूर्तिकारांचे म्हणणे विचारात घेतले जाईल. यातून सुवर्णमध्य निघावा ही अपेक्षा आहे. 

सरकारी अधिकाऱ्यांची इच्छा असेल, तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत.  पीओपीचा पुनर्वापर होऊ शकतो. यासाठी एखादा पथदर्शी प्रकल्प उभा केला आणि विसर्जित केलेल्या मूर्ती बाहेर काढून पीओपीचा पुनर्वापर करता येऊ शकतो. कृत्रिम तलावांतील मूर्तींचा पुनर्वापर होऊ शकतो. त्यामुळे प्रदूषणही होणार नाही. पीओपीचे काम करणाऱ्या मूर्तिकारांना शाडूच्या मातीचे मूर्तिकाम करता येत नाही. दोन्ही मुद्दे वेगळे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

‘शाडूच्या मूर्तींवर भर द्यावा’मूर्तिकार सचिन मेस्त्री यांच्या मते मात्र शाडूच्या मातीच्या मूर्तीवर भर द्यायला हवा. यासाठी महापालिकेने पुढील वर्षी मूर्तिकारांना मंडपासाठी सहा महिने अगोदर परवानगी द्यावी. माती अगोदर उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून शाडूच्या मातीची मूर्ती तयार करण्यास जास्त वेळ मिळेल. गेल्या दहा वर्षांत पीओपी मूर्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तीचे काम करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, किमान लहान मूर्ती तरी शाडूच्या केल्या, तरी अडचणी दूर होतील.

‘नियोजन लवकर करावे’मूर्तिकार राहुल घोणे यांच्या म्हणण्यानुसार, पीओपीच्या मूर्तींना परवानगी मिळाल्यानंतर अधिकाधिक मूर्ती कृत्रिम तलावांत विसर्जित व्हाव्यात, यासाठी महापालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढविली पाहिजे.  मोठ्या मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्याची निकड भासणार आहे. दरम्यान, पुढील वर्षीचे नियोजन शासनाने लवकर करावे. शाडूच्या मातीची मूर्ती कमीत कमी किमतीत मिळावी. मूर्तिकारांना माती लवकर मिळावी यासाठी प्रयत्न केले, तर अडचणी येणार नाहीत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन