शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शेतक-यांप्रति सरकार असंवेदनशील , अशोक चव्हाण यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:10 AM

शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

जळगाव : शेतमालाला हमीभाव, भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आत्महत्या करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घ्यावी लागली. मात्र, तरीदेखील या असंवेदनशील सरकारला जाग आलेली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बुधवारी जळगावात काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘व्हीजन २०१९’ शिबिरात खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, भाई जगताप, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस आदी नेते मंडळी उपस्थित होती.जनतेचे प्रश्न सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्यामुळे भावनिक व जातीय मुद्दे उपस्थित करून लोकांची मने विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रातील मंत्रीच राज्यघटना बदलण्याची भाषा करू लागले आहेत. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. भाववाढ अटळ असून, या इंधन दरवाढीविरुद्ध १६ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.साहेब, स्वबळावर लढा!स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेसने इतर पक्षाशी आघाडी केल्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही. लोकांना ‘पंजा’चा विसर पडू नये, यासाठी तरी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्या, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे धरला.बुलेट ट्रेन नको- पृथ्वीराजबुलेट ट्रेनचा निर्णय अव्यवहार्य असून, त्यावर होणारा भरमसाठ खर्च रेल्वेच्या इतर विकासासाठी खर्च केल्यास मोठा फायदा होऊ शकतो़ निविदा न काढता जपानला कंत्राट दिल्याने याची चौकशी व्हावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणFarmerशेतकरी