शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पाकिस्तानकडून भारतातील सर्व स्त्रियांचा अवमान- अॅड. उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 13:52 IST

मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती.

मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती; मात्र पाकिस्तानने जाधव यांच्या आई व पत्नीचा अवमान करून संपूर्ण भारतातील स्त्रियांचा अवमान केला, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाट्य दिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक यांनी घेतलेल्या मुलाखतीत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. निकम म्हणाले की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीचा अवमान करून संपूर्ण भारतातील स्त्रियांचा अवमान केला आहे. बुटात चिप आहे काय हे समजत नसलेल्या पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा भिकारी आहे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.व्यक्ती पाहिल्यानंतर तिची वृत्ती, प्रवृत्तीचा मी अंदाज बांधतो. आरोपीवर मानसिक प्रभाव टाकावा लागतो. अबू सालेम यास, मोनिका तुझ्यावर खरोखर प्रेम करीत होती का, बिगबॉसमध्ये दुस-यासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू आहे, असे मी म्हटल्यावर तो दुस-या दिवसापासून पाहा असे म्हणाला. दुस-या दिवसापासून बिग बॉसमध्ये मोनिका ही सहका-यासोबत चार हात लांब असल्याचे दिसले. यामुळे गुन्हेगारांचे हात किती लांब असतात, हे समजले. मुख्यमंत्री, राज्यपाल व हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तींसह मला देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा माझ्यासाठी भूषणावह नाही.आपण शास्त्र शाखेचे विद्यार्थी, वडील राजकारणी असताना राजकारणात न जाता वकील कसे झाला, या प्रश्नावर निकम म्हणाले की, वकील होण्याची माझी इच्छा नव्हती. लग्नाच्या बाजारात वकिलाची किंमत डाऊन आहे. काळ्याचे पांढरे, खºयाचे खोटे असा आभास निर्माण करणारा वकील असा त्याचा लौकिक आहे. आपल्या देशात या व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीने पाहात नाहीत. परदेशात मात्र या व्यवसायाला प्रतिष्ठा आहे. देव, धर्म, योगावर विश्वास आहे का? या प्रश्नावर मी नास्तिक व आस्तिक दोन्हीही नाही, असे त्यांनी सांगितले.वकिली करीत असताना मला संतापाने कविता सूचत गेल्या. डोळे फाडून बघते ती बायको, जिच्यापुढे डाळ शिजत नाही, ती असते बायको, मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे या कविता त्यांनी उपस्थितांना ऐकविल्या. एखाद्या खटल्याचा युक्तिवाद करताना संस्कृत या भाषेमुळे न्यायाधीशांवर प्रभाव पडतो. हा भाषेचा फायदा असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.रस्ते का खराब?सांगली, मिरजेतील खराब रस्त्यांचा अ‍ॅड. निकम यांनी मुलाखतीत उल्लेख केला. सांगलीने राज्याला नेतृत्व व अनेक मुख्यमंत्री दिले; मात्र तरीही येथील रस्ते खराब का आहेत, हे माहीत नसल्याचे अ‍ॅड. निकम यांनी मिश्किलपणे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली