शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सारा लग्नाचा खर्च माझा....तुम्ही फक्त पोरगी द्या...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 19:39 IST

हुंडा मिळाला नाही तर किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे...

ठळक मुद्देवरपित्याची याचना : मुलींची संख्या घटल्याने ग्रामीण भागातील विवाह चक्रच पालटले 

शिरुर (कान्हूरमेसाई) : पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे. हुंडा मिळाला नाही तर किंवा मानपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची. पण आता बदलत्या परिस्थितीत मुलीची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे  सध्या चक्र पालटले असून, आम्हाला हुंडा नको फक्त तुमची मुलगीच हवी, अशी आर्जव करण्याची वेळ उपवर पित्यावर आलेली दिसून येत आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतीला वाईट दिवस आले आहेत, त्यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी-समाधानाने नांदावी अशीच आस आई-वडिलांना असते. त्यापोटीच चांगला वर शोधण्यासाठी पिता समाजात, लग्नकार्यात फिरताना तसेच नातेवाइकांमध्ये विचारपूस करताना दिसतो. सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधूपित्याची नजर कमावत्या मुलाकडे वळली आहे. त्या दृष्टीने वधूपिता  मुलांकरिता शोधमोहीम राबवित असल्याचे दिसून येत आहे. पण शेतकरी पित्याची मुलगी  असो वा नोकरदार पित्याची, सर्वच जण शेतकरी  मुलांकडे दुर्लक्ष करीत आहेत. निसर्गाच्या दुष्टचक्र,तोट्याचा ठरणारा शेती व्यवसाय आणि मुलीच्या पित्याचे असलेले नोकरदार मुलांचे स्वप्न त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहेच्छुक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी आत्महत्यामागे नैैसर्गिक आणि शासनाच्या  अनस्थेने निर्माण झालेल्या कारणाप्रमाणेच शेतकºयांनी स्वत:भोवती  गुंडाळून घेतलेल्या सामाजिक प्रतिष्ठेची प्रथाही कारणीभूत  असल्याचे  बोलले जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्नाचे बार धूमधडाक्यात उरकण्याकरिता वाट्टेल ते करणाऱ्या बहुतांश शेतकरी कुटुंबीयांना आता  बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळवण्याकरिता आटापिटा करावा लागत आहे. त्यामुळे  मुलांकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करायला तयार होत आहे, तर काहींनी मुलींना हुंडाही दिल्याचे वास्तव असल्याने या परिस्थितीवरून मुलापेक्षा मुलगी बरी ,असे म्हणण्याची वेळ वर पित्यावर आली आहे. मुलीच्या शोधात वाढतेय वय....  शिरूर तालुक्यातील हजार पंधराशे लोकसंख्या  असलेल्या अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही  लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता  ३0 ते ३५ वर गेलेले दिसून येत आहे. परिसरात  अनेक गावांमधील तरुण मंडळी  मागील तीन वर्षांपासून लग्नाच्या प्रतीक्षेत  आहे. तरीही मुलगी मिळत नसल्याने  काही नवरदेवांनी  मुलगी पाहण्यासाठी बीड, उस्मानाबाद, लातूर, बार्शी, नांदेड, पूर्णा, या गावांकडे आपली शोधमोहीम सुरू आहे. काही मुलांनी तुम्हाला पाहिजे असेल तर पैसा देतो, लग्नाचा संपूर्ण खर्च आम्हीच करतो फक्त मुलगी  द्या, असाही निर्णय  घेतल्याचे  सांगितले जाते, तरीही मुलगी मिळत नसल्याचे वास्तव आहे. ही परिस्थिती तालुक्याचीच नाही तर इतर भागात हीच अवस्था आहे. ,

शेतकरी  नवरा नको,  पण शेती हवी....

 शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठी सध्या कोणताही वधूपिता तयार होत नाही, आधी नोकरीला  प्राधान्य  दिले जाते, मुलगा नोकरीवर असल्यास त्याला  मुलगी  देण्याकरिता होकार  दर्शवितात, परंतु काही  ठिकाणी सध्या नोकरीसोबतच शेती आहे का?   असाही  प्रश्न पुढे येतो. काहींना  नोकरीसोबतच  मुलाकडे  शेतीही  पाहिजे आहे, यावर  शेतकरी नवरा नको,  पण शेती हवीय, पण कशासाठी?  असा प्रश्न वरपित्यामध्ये उपस्थित होत आहे .

-----------

 

टॅग्स :Shirurशिरुरmarriageलग्नWomenमहिला