शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 19:49 IST

जागावाटपावरूनही इंडिया आघाडीत भांडणे होणार आहेत असं अडसूळ यांनी म्हटलं.

अमरावती - इंडिया आघाडीत रोज एक नेता उठतो आणि स्वत:ला पंतप्रधान म्हणून प्रमोट करतो. २८ पक्षातील नेते मग नीतीश कुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी हे प्रत्येक दिवस मनातल्या मनात पंतप्रधान झालेत. पण जेव्हा त्यांना कळतं, आपलं इथं काही होणार नाही तेव्हा एक एक करून ते बाहेर पडतील असा टोला शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे. 

अभिजीत अडसूळ म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जागावाटप करावे लागेल त्यावरून इंडिया आघाडीत पुन्हा भांडणे होणार आहेत. शेवटी काँग्रेस ही एकमेव त्या आघाडीत राहणार आहे. अमरावती मतदारसंघावर आम्ही दावा करतोय. २० फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल. अमरावतीत नवनीत राणा यांनी खोटी प्रमाणपत्रे देऊन निवडून आल्यात. जर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तर कदाचित अशा राखीव जागेवर बोगस प्रमाणपत्रे देऊन असे लोक उभे राहतील. मग अन्याय झालेले लोक सुप्रीम कोर्टाविरोधात भाष्य करतील असं त्यांनी म्हटलं.

अमरावती मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

सर्व पक्षांचा विरोध, प्रहारचे २ आमदार, शिवसेनेचा विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीही विरोधात अशी खासदार नवनीत राणा यांची परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात नवनीत राणांना विरोध वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला शिवसेनेलाच तिकीट मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत असं शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी सांगितले. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस