शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 19:49 IST

जागावाटपावरूनही इंडिया आघाडीत भांडणे होणार आहेत असं अडसूळ यांनी म्हटलं.

अमरावती - इंडिया आघाडीत रोज एक नेता उठतो आणि स्वत:ला पंतप्रधान म्हणून प्रमोट करतो. २८ पक्षातील नेते मग नीतीश कुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी हे प्रत्येक दिवस मनातल्या मनात पंतप्रधान झालेत. पण जेव्हा त्यांना कळतं, आपलं इथं काही होणार नाही तेव्हा एक एक करून ते बाहेर पडतील असा टोला शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे. 

अभिजीत अडसूळ म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जागावाटप करावे लागेल त्यावरून इंडिया आघाडीत पुन्हा भांडणे होणार आहेत. शेवटी काँग्रेस ही एकमेव त्या आघाडीत राहणार आहे. अमरावती मतदारसंघावर आम्ही दावा करतोय. २० फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल. अमरावतीत नवनीत राणा यांनी खोटी प्रमाणपत्रे देऊन निवडून आल्यात. जर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तर कदाचित अशा राखीव जागेवर बोगस प्रमाणपत्रे देऊन असे लोक उभे राहतील. मग अन्याय झालेले लोक सुप्रीम कोर्टाविरोधात भाष्य करतील असं त्यांनी म्हटलं.

अमरावती मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

सर्व पक्षांचा विरोध, प्रहारचे २ आमदार, शिवसेनेचा विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीही विरोधात अशी खासदार नवनीत राणा यांची परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात नवनीत राणांना विरोध वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला शिवसेनेलाच तिकीट मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत असं शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी सांगितले. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस