शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

देशातील सर्व व्यवस्था जातीयवाद्यांच्या ताब्यात  : एच. डी. देवेगौडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 8:47 PM

लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देधर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन

पुणे : देशातील सर्व व्यवस्था जातीयवादी शक्तींनी ताब्यात घेतल्या आहेत. लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असून त्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन माजी पंतप्रधान व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी केले. कर्नाटकातील जनता दलाचे सरकार सत्तारूढ होताना अशा शक्ती एकत्र येण्याची शक्यता होती, मात्र ते झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.जनता दल कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा शुक्रवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, आमदार प्रा. शरद पाटील, पक्षाचे कार्याध्यक्ष व राज्याचे प्रभारी पीजीआर सिंधीया, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष सरिता मानकर, पुणे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, युवक प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे उपस्थित होते.देवेगौडा म्हणाले, भारतीय जनता पाटी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल हे नेते एकत्र येण्याची चिन्हे होती, मात्र दुदैर्वाने ते साध्य झाले नाही. त्यानंतर आता पुन्हा देशातील स्थिती बिघडली आहे. प्रत्येक यंत्रणेत सरकारी हस्तक्षेप होतो आहे. याचा सगळ्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे.कोळसे म्हणाले, सरकार त्यांचा छुपा अजेंडा अंमलात आणते आहे. निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी देशस्तरावर आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सडून मरायचे की लढून हे ठरवण्याची वेळ आली आहे. देशातील वयोवृद्ध नेते रस्त्यावर येण्याची भाषा करत असताना युवकांनी घरात बसून राहू नये, आमच्याबरोबर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सिंधिया, गडहिंग्लज नगरपालिकेच्या पक्षाच्या नगराध्यक्ष स्वाती काळे, शेवाळे, शिंदे यांची यावेळी भाषणे झाली. ...........साठीच्या पुढील सर्व शेतकºयांना सरकारने दरमहा ५ हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. राज्यात तसेच देशात असलेल्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या सर्व नेत्यांबरोबर, मुळ जनता दलातून बाहेर पडून नवा पक्ष, संघटना स्थापन करणाºयांबरोबर चर्चा करावी. त्यांना देशाची सद्यस्थिती सांगावा व एकत्र येण्याचे महत्व पटवून द्यावे अशी सुचना यावेळी देवेगौडा, कोळसे यांनी कार्यकर्त्यांना केली.

टॅग्स :PuneपुणेH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाGovernmentसरकार