शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

देशातील सर्व व्यवस्था जातीयवाद्यांच्या ताब्यात  : एच. डी. देवेगौडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:48 IST

लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देधर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन

पुणे : देशातील सर्व व्यवस्था जातीयवादी शक्तींनी ताब्यात घेतल्या आहेत. लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. याविरोधात आवाज उठवणे गरजेचे असून त्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे, असे आवाहन माजी पंतप्रधान व जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी केले. कर्नाटकातील जनता दलाचे सरकार सत्तारूढ होताना अशा शक्ती एकत्र येण्याची शक्यता होती, मात्र ते झाले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.जनता दल कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय मेळावा शुक्रवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिरात देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. जी. कोळसे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, आमदार प्रा. शरद पाटील, पक्षाचे कार्याध्यक्ष व राज्याचे प्रभारी पीजीआर सिंधीया, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष सरिता मानकर, पुणे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, युवक प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे उपस्थित होते.देवेगौडा म्हणाले, भारतीय जनता पाटी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल हे नेते एकत्र येण्याची चिन्हे होती, मात्र दुदैर्वाने ते साध्य झाले नाही. त्यानंतर आता पुन्हा देशातील स्थिती बिघडली आहे. प्रत्येक यंत्रणेत सरकारी हस्तक्षेप होतो आहे. याचा सगळ्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे.कोळसे म्हणाले, सरकार त्यांचा छुपा अजेंडा अंमलात आणते आहे. निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी देशस्तरावर आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सडून मरायचे की लढून हे ठरवण्याची वेळ आली आहे. देशातील वयोवृद्ध नेते रस्त्यावर येण्याची भाषा करत असताना युवकांनी घरात बसून राहू नये, आमच्याबरोबर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सिंधिया, गडहिंग्लज नगरपालिकेच्या पक्षाच्या नगराध्यक्ष स्वाती काळे, शेवाळे, शिंदे यांची यावेळी भाषणे झाली. ...........साठीच्या पुढील सर्व शेतकºयांना सरकारने दरमहा ५ हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावे या मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. राज्यात तसेच देशात असलेल्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या सर्व नेत्यांबरोबर, मुळ जनता दलातून बाहेर पडून नवा पक्ष, संघटना स्थापन करणाºयांबरोबर चर्चा करावी. त्यांना देशाची सद्यस्थिती सांगावा व एकत्र येण्याचे महत्व पटवून द्यावे अशी सुचना यावेळी देवेगौडा, कोळसे यांनी कार्यकर्त्यांना केली.

टॅग्स :PuneपुणेH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाGovernmentसरकार