परिवहन विभागाच्या सर्व सेवा आॅनलाइन
By Admin | Updated: November 1, 2015 00:51 IST2015-11-01T00:51:20+5:302015-11-01T00:51:20+5:30
राज्य प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत १४ प्रकारच्या सेवा कार्यान्वित आहेत. त्या सर्व सेवा आॅनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू असून, येत्या २६ जानेवारीला त्या सुरू होतील, अशी माहिती

परिवहन विभागाच्या सर्व सेवा आॅनलाइन
ठाणे : राज्य प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत १४ प्रकारच्या सेवा कार्यान्वित आहेत. त्या सर्व सेवा आॅनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू असून, येत्या २६ जानेवारीला त्या सुरू होतील, अशी माहिती राज्याच्या परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
मुदतबाह्य झालेल्या परवाने नूतनीकरणाबाबत शासनाने राबवलेल्या अभय योजनेची माहिती घेण्यासाठी त्या शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या वेळी त्यांनी मोहिमेला ठाणे, कल्याणात अल्पप्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट करून, या मोहिमेसाठी येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगितले, तसेच त्यानंतरही १५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान, विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. परवानाधारकांनी मुदतबाह्यपरवान्यांचे नूतनीकरण करून घेतले नाही, तर ते कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील. आरटीओ आणि पोलिसांनी नल्ला गाड्यांची (विना परवाना बोगस रिक्षा) ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये कळवा-मुंब्रा आणि भिवंडीचा समावेश आहे. जप्त होणारी वाहने साकेत ग्राउंडमध्ये ठेवली जाणार असून, तेथे सुरक्षा पुरवली जाणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले.
पोलिसांचे पुरेपूर सहकार्य : शहर पोलीस आयुक्तालयात नोंदणी रद्द झालेल्या वाहनांविरोधात आरटीओ विभाग जी मोहीम हाती घेणार आहे त्या मोहिमेला शहर पोलीस पुरेपूर सहकार्य करणार असल्याचे ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.
नोंदणी रद्द वाहने जेसीबीने बाद करणार
यापुढे नोंदणी रद्द होणारी वाहने जेसीबीने तोडून बाद करण्यात येणार आहेत. पूर्वी नोंदणी रद्द वाहनांचे तुकडे करून ती बाद केली जात होती. मात्र, ते तुकडे पुन्हा वेल्डिंग करून जोडले जात असल्याने, ही वाहने पुन्हा रस्त्यांवर धावतात. त्यामुळे आता ती वाहने धावणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती ठाणे आरटीओ अधिकारी विकास पांडकर यांनी दिली.
लवकरच १ लाख नवीन परवाने
राज्यात लवकरच १ लाख नवीन परमीट काढण्यात येणार आहेत. मात्र, मुदतबाह्य होणाऱ्या परवानाधारकांना यापुढे कोणत्याच लॉटरी पद्धतीत भाग घेता येणार नसल्याचेही सेठी यांनी सांगितले.