शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:40 IST

"समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही"

आष्टी/कडा (जि. बीड) : राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे वीज बिलाचा बोजा शेतकऱ्यांवर येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

छत्रपती संभाजीनगर आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी, तसेच बोगदा कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदामंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, आ. विजयसिंह पंडित, आ. नारायण पाटील, आदी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जी १६ हजार मेगावॅट वीज लागते ती सर्व सोलरवर घेतली जाईल. याचे काम डिसेंबर २०२५ किंवा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे आठ रुपये युनिटऐवजी तीन रुपयांनी वीज मिळून पाच रुपये वाचतील. या वाचलेल्या पैशांतून घरगुती, औद्योगिक वापराची बिले कमी करू.  

पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही  

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. हे ५३ टीएमसी पाणी आले तर मराठवाड्याची पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल. एवढेच नव्हे तर चार नदीजोड प्रकल्पांमुळे मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदेखील दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही

सरपंच परिषदेचे काही लोक भेटले. संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या खपवून घेणार नाही. यात कोणीही असले तरी त्यावर कारवाई करणार. तसेच नवीन बीड तयार करायचे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शांततेचे आवाहन केले. 

आमदार सुरेश धस म्हणाले, ‘मी मुख्यमंत्र्यांचा लाडका’   

ठरावीक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तींना पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली, पण संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली कणखर भूमिका सर्वांना आवडली.

फडणवीस हे बिनजोड पहिलवान आहेत. प्रशांत बंब जसे लाडके आहेत, तसेच मीपण मुख्यमंत्र्यांचा लाडकाच आहे, असे आ. सुरेश धस यावेळी म्हणाले. तसेच राख, वाळू, गुटखामाफियांवर मकोका लावावा, अशी मागणीही आ. धस यांनी केली. 

‘मेरा वचन ही मेरा शासन’

धस यांनी भाषणात ‘देवेंद्र बाहुबली’ असा उल्लेख केला. त्याचा धागा पकडत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी धस मला शिवगामी म्हणत होते. शिवगामीचे ‘मेरा वचन ही मेरा शासन है’ हे वाक्य होते. त्यामुळे हेच माझे शासन आहे. बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही. मी येणार नाही, असे अनेकांना वाटले. परंतु, मीपण मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. म्हणूनच तर हेलिकॉप्टरमधून आले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार