शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

शेतकरी कर्जमुक्ती व इतर मागण्यांसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीचा राज्यभर रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 17:46 IST

किसान सभेचा लॉंग मार्च व एक जूनचा शेतकरी संप यात मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमुक्ती व दूध तथा शेतीमालाला रास्त भावाच्या मागणीसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १० जून रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुंबई- किसान सभेचा लॉंग मार्च व एक जूनचा शेतकरी संप यात मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमुक्ती व दूध तथा शेतीमालाला रास्त भावाच्या मागणीसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १० जून रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी पावसाचे दिवस असतानाही या राज्यव्यापी आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. राज्यभरातील २१ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले.ऐतिहासिक शेतकरी संपाला एक जून रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण मागण्यांच्या पूर्ततेसाठी किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले होते. एक जून रोजी राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालण्यात आले. पाच जून रोजी मोझाम्बिकची तूर, पाकिस्तानची साखर व बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणारे दूध तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवून आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, प्रहार, भूमिपुत्र शेतकरी संघटना, शरद जोशी विचार मंच, लाखगंगा आंदोलन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, शेतकरी कृती समिती, पीपल्स हेल्प लाईन व भारतीय कृषक समाज यासह विविध संघटना सामील झाल्या होत्या. आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने दूध दरप्रश्नी शासन आदेश काढला आहे. मात्र काढण्यात आलेल्या शासन आदेशात अनेक संदिग्धता आहेत. सहकारी दूध संघांनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आहे. खासगी दूध कंपन्यांना हा आदेश लागू नाही. लॉंग मार्चच्या मान्य मागण्याचीही सरकारने अद्याप अंमलबजावणी केलेली नाही, अशा या पार्श्वभूमीवर हे चक्क जाम आंदोलन करण्यात आले.दुधाला रास्त भाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त व वीजबिलमुक्ती करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची कायदेशीर हमी द्या, बियाणे, कीटकनाशके व शेती आदाने निर्माते व विक्रेत्यांकडून शेतक-यांची होणारी लूटमार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. स्वस्त दरात शेती आदाने उपलब्ध करून द्या, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी कसणारांच्या नावे करा, आकारी पड जमिनीचा प्रश्न सोडवा, कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन द्या व शेतक-यांसाठी पिक, पशु व कुटुंब आरोग्य विम्याचे सर्वंकष संरक्षण दया या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.1 ते 10 जून या काळात झालेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. मागण्यांची संपूर्ण सोडवणूक झाल्या शिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे संघर्ष समितीने जाहीर केले आहे. यावेळी डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी. गावीत, आ. बच्चू कडू, किसन गुजर, डॉ. अजित नवले, संतोष वाडेकर, अनिल देठे, विठ्ठल पवार, धनंजय धोरडे, अशोक सब्बन, एस. बी. नाना, कारभारी गवळी, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्च