शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागचा कांदा, नंदुरबारची मिरची अन् काष्टीची कोथिंबीर; १२१ शेतमालाला नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:08 IST

आतापर्यंत १२९ शेतमाल उत्पादनांना मानांकन 

देशात आतापर्यंत १२९ शेतमाल उत्पादनांना हे मानांकन मिळाले आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे २६ उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये नाशिकच्या द्राक्षांसह कोकणचा हापूस, लासलगावचा कांदा, कोल्हापूरचा गूळ, नागपूरची संत्री, सोलापूरची ज्वारी, नवापूरची तूरडाळ, पुरंदरचे अंजीर अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे. 

हे मानांकन मिळाल्यामुळे या सर्व उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली. उत्पादन वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.जीआय मानांकनची मागणी वैयक्तिक करता येत नाही. समूहाने करावी लागते. त्या शेतमालाचे उत्पादनही त्या परिसरातील एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी करणे आवश्यक असते. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित संस्थेच्या वतीने वर्षभर त्याचे परीक्षण सुरू असते. 

त्यात त्या उत्पादनाच्या परिसराच्या इतिहासाबरोबरच वस्तूच्या गुणवत्तेतील सातत्य, वैशिष्ट्यपूर्णत: अशा अनेक गोष्टींची तज्ज्ञांच्या पथकाद्वारे शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली जाते. या कसोट्या पार केल्यानंतर पुन्हा तब्बल सहा महिने जनमत अजमावले जाते. इतक्या कठोर परीक्षणानंतरच हे मानांकन दिले जाते.