शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अलिबागचा कांदा, नंदुरबारची मिरची अन् काष्टीची कोथिंबीर; १२१ शेतमालाला नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:08 IST

आतापर्यंत १२९ शेतमाल उत्पादनांना मानांकन 

देशात आतापर्यंत १२९ शेतमाल उत्पादनांना हे मानांकन मिळाले आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे २६ उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये नाशिकच्या द्राक्षांसह कोकणचा हापूस, लासलगावचा कांदा, कोल्हापूरचा गूळ, नागपूरची संत्री, सोलापूरची ज्वारी, नवापूरची तूरडाळ, पुरंदरचे अंजीर अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे. 

हे मानांकन मिळाल्यामुळे या सर्व उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली. उत्पादन वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.जीआय मानांकनची मागणी वैयक्तिक करता येत नाही. समूहाने करावी लागते. त्या शेतमालाचे उत्पादनही त्या परिसरातील एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी करणे आवश्यक असते. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित संस्थेच्या वतीने वर्षभर त्याचे परीक्षण सुरू असते. 

त्यात त्या उत्पादनाच्या परिसराच्या इतिहासाबरोबरच वस्तूच्या गुणवत्तेतील सातत्य, वैशिष्ट्यपूर्णत: अशा अनेक गोष्टींची तज्ज्ञांच्या पथकाद्वारे शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली जाते. या कसोट्या पार केल्यानंतर पुन्हा तब्बल सहा महिने जनमत अजमावले जाते. इतक्या कठोर परीक्षणानंतरच हे मानांकन दिले जाते.