शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

हवा चार कार्यक्रमांची, बाकी सगळी झुळूकच; स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 04:58 IST

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे दुसऱ्या दिवशी साहित्यनगरीत सकाळपासून ठाण मांडून बसले होते.

साहित्य संमेलनात कार्यक्रमांची प्रचंड रेलचेल आहे. पण स्वागताध्यक्ष राज्यमंत्री असल्यामुळे संमेलनाचा फायदा भविष्यातील स्थानिक राजकीय घडामोडींसाठी झाला पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.  संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी झालेले अजय-अतुल, चला हवा येऊ द्या कार्यक्रम आणि उद्घाटनाला स्वागताध्यक्षांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित असल्यामुळे त्या तीन कार्यक्रमांकडे विशेष लक्ष दिले. समारोपालाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असल्यामुळे त्याकडे लक्ष देण्यात येत आहे. बाकी कार्यक्रमांसाठी पाहिजे तेवढे नियोजन, लक्ष देण्यात येत नसल्याची कुजबुज साहित्यिक गटागटाने करीत आहेत. त्यामुळे संमेलनात चार कार्यक्रमांचीच  हवा असून बाकी सगळी झुळूकच असल्याचा प्रत्यय येत आहे.

वाजवा रे टाळी.. साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी सायंकाळी ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण; किती खरे, किती खोटे’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादातील एक वक्ते सतत रसिकांना वर हात करण्यास लावून वाजवा रे टाळी, अशी हाळी देत होते. त्यातून रसिकांचं मनोरंजन तर होतच होतं. परंतु अनेकांना वाजवा रे टाळी विषयी कुतूहलही वाटत होते. या वाजवा रे टाळीची चर्चा मात्र साहित्यनगरीत गटागटाने करण्यात येत होती.

भरउन्हात संमेलनाची जत्रा..ग्रामीण भागात चैत्र पौर्णिमेनंतर गावोगाव यात्रांचे पेव फुटते. शेतीची कामे आटोपल्याने लोक निवांत असतात. शेतमालाचे चार पैसे हाती आल्याने मग देव-देव, जत्रा सुरू होते. उदगीरच्या संमेलनातही अशीच काहीशी कुजबुज रंगली होती. संमेलन नगरीत बाहेरगावच्या लोकांचे लोंढे दिसून येत होते. दुसरीकडे विविध सभागृहात मात्र घामाच्या धारा निघत असल्याने लोक काही वेळातच बाहेर पडताना दिसत होते. खाद्यकट्ट्यावर मात्र जत्रा भरून वाहत होती. त्यामुळे या संमेलनाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याची कुजबुज रंगात आली होती.

स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरनसाहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे दुसऱ्या दिवशी साहित्यनगरीत सकाळपासून ठाण मांडून बसले होते. या सभामंडपातून त्या सभामंडपात सतत फिरत होते. त्यांच्यासोबत सगळ्या गाड्यांचा ताफाही फिरत होता. अगदी अंथरलेल्या गालिचावरून हा ताफा जात होता. ताफा जाताना सतत सायरन वाजविण्यात येत होते. त्यातून मंत्री महोदयांना नेमका कोणता संदेश द्यायचा होता, हे शेवटपर्यंतही रसिकांच्या लक्षात येत नव्हते. या सायरनची मात्र दबक्या आवाजात साहित्यनगरीत चर्चा सुरू होती.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ