शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

हवा चार कार्यक्रमांची, बाकी सगळी झुळूकच; स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 04:58 IST

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे दुसऱ्या दिवशी साहित्यनगरीत सकाळपासून ठाण मांडून बसले होते.

साहित्य संमेलनात कार्यक्रमांची प्रचंड रेलचेल आहे. पण स्वागताध्यक्ष राज्यमंत्री असल्यामुळे संमेलनाचा फायदा भविष्यातील स्थानिक राजकीय घडामोडींसाठी झाला पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.  संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी झालेले अजय-अतुल, चला हवा येऊ द्या कार्यक्रम आणि उद्घाटनाला स्वागताध्यक्षांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित असल्यामुळे त्या तीन कार्यक्रमांकडे विशेष लक्ष दिले. समारोपालाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असल्यामुळे त्याकडे लक्ष देण्यात येत आहे. बाकी कार्यक्रमांसाठी पाहिजे तेवढे नियोजन, लक्ष देण्यात येत नसल्याची कुजबुज साहित्यिक गटागटाने करीत आहेत. त्यामुळे संमेलनात चार कार्यक्रमांचीच  हवा असून बाकी सगळी झुळूकच असल्याचा प्रत्यय येत आहे.

वाजवा रे टाळी.. साहित्य संमेलनात पहिल्या दिवशी सायंकाळी ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्यांचे चित्रण; किती खरे, किती खोटे’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादातील एक वक्ते सतत रसिकांना वर हात करण्यास लावून वाजवा रे टाळी, अशी हाळी देत होते. त्यातून रसिकांचं मनोरंजन तर होतच होतं. परंतु अनेकांना वाजवा रे टाळी विषयी कुतूहलही वाटत होते. या वाजवा रे टाळीची चर्चा मात्र साहित्यनगरीत गटागटाने करण्यात येत होती.

भरउन्हात संमेलनाची जत्रा..ग्रामीण भागात चैत्र पौर्णिमेनंतर गावोगाव यात्रांचे पेव फुटते. शेतीची कामे आटोपल्याने लोक निवांत असतात. शेतमालाचे चार पैसे हाती आल्याने मग देव-देव, जत्रा सुरू होते. उदगीरच्या संमेलनातही अशीच काहीशी कुजबुज रंगली होती. संमेलन नगरीत बाहेरगावच्या लोकांचे लोंढे दिसून येत होते. दुसरीकडे विविध सभागृहात मात्र घामाच्या धारा निघत असल्याने लोक काही वेळातच बाहेर पडताना दिसत होते. खाद्यकट्ट्यावर मात्र जत्रा भरून वाहत होती. त्यामुळे या संमेलनाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याची कुजबुज रंगात आली होती.

स्वागताध्यक्षांच्या गाड्यांचा ताफा अन् सायरनसाहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे हे दुसऱ्या दिवशी साहित्यनगरीत सकाळपासून ठाण मांडून बसले होते. या सभामंडपातून त्या सभामंडपात सतत फिरत होते. त्यांच्यासोबत सगळ्या गाड्यांचा ताफाही फिरत होता. अगदी अंथरलेल्या गालिचावरून हा ताफा जात होता. ताफा जाताना सतत सायरन वाजविण्यात येत होते. त्यातून मंत्री महोदयांना नेमका कोणता संदेश द्यायचा होता, हे शेवटपर्यंतही रसिकांच्या लक्षात येत नव्हते. या सायरनची मात्र दबक्या आवाजात साहित्यनगरीत चर्चा सुरू होती.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ