शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 17:44 IST

देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करून महाराष्ट्राची शक्ती त्यांच्यामागे उभी करायची आहे त्यासाठी मिशन ४८ संकल्प केला आहे असं अजित पवारांनी सांगितले.

मुंबई – नुकतेच निती आयोगाचे मुंबईत बैठक घेऊन पुढील विकास आराखडा बनवणार असल्याचे सांगितले. त्यावरून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला. या आरोपाचा महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. जोपर्यंत चंद्र, सूर्य तारे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कुणाचा बापही करू शकत नाही अशा शब्दात अजित पवारांनी आव्हाड-राऊत यांना फटकारले आहे.

अजित पवार म्हणाले की, अलीकडेच निती आयोगासोबत बैठक झाली, काहीजण विकासाच्या बाबतीत बोलत नाही. राज्याचे हित कशात ते सांगत नाही. परंतु जातीजातीत धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करायचे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर न्यायची आहे असं पंतप्रधान सांगतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते. निती आयोगाने देशात ४ शहरे निवडली आहे. टप्प्याटप्प्याने त्या शहरात वाढ होईल. मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला जातो. मी जे बोलतो ते खरे बोलतो, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करणं कुणाच्या बापाला शक्य नाही. काहीही सांगायचे आणि दिशाभूल करायची. अनेकदा याप्रकारचे आरोप केले गेले. निव्वळ जनतेची दिशाभूल केली जाते. तुम्ही विकासावर बोला, राज्याचे जनतेचे हित कशात त्यावर बोला. काही चुकत असेल तर ते दाखवा. काम करताना एखादी गोष्ट चुकली तर ताबोडतोब दुरुस्त करण्याची तयारी आहे. वाराणसी उत्तर प्रदेशातून, सुरत गुजरातमधून बाहेर काढायचे चालले आहे का? उद्या पुणे, पिंपरी चिंचवडचे नाव घेतले तर तेदेखील राज्यातून काढायचे असा आरोप करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतो, त्याच्या वाटचालीचा आज सर्वात दिशादर्शक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी नेतृत्वात भारताची विकासाकडे घौडदौड सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. झाले गेले गंगेला मिळाले, नवी पहाट नवीन सुरुवात या दृष्टीने आम्हाला पुढे जायचे आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील भारतीयांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य घटकांपर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करतंय असंही अजित पवार म्हणाले.

मोदींचे हात बळकट करू

महाराष्ट्रातील थांबलेली कामे अधिक वेगाने व्हावीत. राज्यभरात सर्व्हे करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेही काही कमी पडू देणार नाही. नैसर्गिक संकटे येतात, अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतो, दरड कोसळते यासारख्या अनेक प्रसंगांना आम्ही सामोरे गेलोय, संकटे आली म्हणून डगमगायचं नसते. अधिक मजबुतीने पुढे जायचे असते. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करून महाराष्ट्राची शक्ती त्यांच्यामागे उभी करायची आहे त्यासाठी मिशन ४८ संकल्प केला आहे असं अजित पवारांनी सांगितले.

महायुतीत कुठलाही वाद नाही

मागच्या गोष्टी उकरण्यापेक्षा आपल्या सर्वांची शक्ती आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा यातून चांदा ते बांदा सर्व ४८ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा सभा झाल्या पाहिजेत. राज्य पातळीवर काम करणारे लोक एकत्र येतात, चर्चा करतात, पण जाणीवपूर्वक आमच्यात वाद असल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. परंतु महायुतीचे यश, राज्याचे हित कशात आहे, कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी एकमेकांशी संवाद ठेवत असतो. महायुतीत समज-गैरसमज राहता कामा नये. मुंबईत हा मेळावा घेतलाय तसा प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात जाऊन जनतेला संबोधित करायचे आहे असं अजितदादांनी म्हटलं.

वन नेशन, वन इलेक्शनला पाठिंबा

१९६७ पर्यंत देशात एक निवडणूक व्हायची, राज्यात १९९९ पर्यंत एकत्रित निवडणूक झाल्या, त्यामुळे खर्च कमी होतो. प्रशासकीय दडपण कमी होते, सारख्या निवडणुका लागल्याने विकासकामे रखडतात. प्रचंड वेळ खर्च होते, देशात कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. त्या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांना वेळ द्यावा लागतो. परंतु विकासकामांना गती देता येत नाही. आचारसंहितेमुळे विकासकामे खोळंबतात, त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे. निवडणुकीमुळे वारेमाप खर्च होतो त्याचाही विचार केला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन ही गरजेची गोष्ट आहे. सर्व लक्ष विकासकामांवर देता येईल. केंद्र सरकारची भूमिका जनतेलाही मान्य असेल असं सांगत अजितदादांनी वन नेशन वन इलेक्शन या भूमिकेला पाठिंबा दिला.

अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून मिळते, युती आणि आघाडी करताना पक्षाच्या विचाराशी प्रतारणा होणार नाही. समाजातील वंचित घटकांना हक्क मिळेल, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. भविष्यातही आमचा हाच प्रयत्न राहणार आहे. महायुतीतही महामानवांबद्दल आदराची भावना आहे. सर्वांच्या विचारानेच राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांनी योगदान दिले पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सर्व पक्षांचे, सर्व विचारांचे लोक सहभागी झाले, त्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र घडला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा देण्याचे काम यशवंतराव चव्हाणांनी केले. राजकारणातील अस्पृशता संपवली पाहिजे. विकासासाठी एकत्र आले पाहिजे. केंद्राकडून अधिक निधी मिळून राज्याला पुढे नेण्यासाठी महायुतीचा भर राहणार आहे. पक्षाच्या हितासाठी, महायुतीसाठी इथून पुढच्या काळात आक्रमक राहिले पाहिजे. अनावश्यक एकमेकांविरोधातील संघर्ष टाळला पाहिजे. महायुतीच्या नेत्यांबद्दल टिप्पण्या करू नये. काम करताना काही समज गैरसमज झाले तर पक्षाच्या वरिष्ठांशी बोलले पाहिजे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. कार्यकर्त्यांच्या पाठिशी मजबुत उभे राहण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केला जाईल असा कानमंत्र अजितदादांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी