शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र अन् भावनिक साद; तुम्हाला हात जोडतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 15:10 IST

पक्षीय मतभेद विसरून मतदारसंघातील कामे करण्यासाठी मी पुढाकार घेईन. भूतकाळात काय घडले ते सोडून द्या. एकदिलाने तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

इंदापूर - परिस्थिती बदललेली आहे. आपणही भूमिका बदलली पाहिजे. फक्त इंदापूर तालुक्यासाठी नव्हे तर सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आवाहन आहे, बोलताना जपून बोला, कुठल्याही मित्रपक्षाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, ही माझी हात जोडून विनंती आहे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

इंदापूर येथील मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, सत्ता नाही म्हणून कार्यकर्त्यांना काम होत नाही अशी कारणे देऊ शकत नाही. कार्यकर्त्यांचा विचार पाहून निर्णय घ्यावा लागतो. मी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणे आणि ज्याच्यात धमक त्याला संधी देणे हे माझे धोरण आहे. निवडणूक हे युद्ध असते, हे युद्ध कार्यकर्त्यांच्या बळावर लढलं जाते. कार्यकर्त्यांनी उचलून धरले की समाजात मान सन्मान मिळत असतो. पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होतो, मेहनतीवर आणि त्यांच्या घामावर मोठा होतो. त्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे असंही अजित पवारांनी सांगितले. 

तसेच लोकसभा, विधानसभा आपण एकत्रित लढवणार आहोत. आपल्याला सर्वांची मदत घ्यावी लागणार आहे. वेगळा उद्देश घेऊन पुढे वाटचाल करतोय. पक्षात आणि सहकारी मित्रपक्षात मतभेद होतील यासाठी अनेकजण देव पाण्यात घालून बसलेत. त्यामुळे असे काही होणार नाही याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. घटकपक्षासोबत सुसंवाद ठेवा, चहापाण्याला बोलवा. सहकारी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्ष कार्यालयात यायला हवेत. आपलेही कार्यकर्ते तिथे जायला हरकत नाही. एकमेकांचा मान सन्मान ठेवा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत. 

दरम्यान, लोकसभेच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणायच्या आहेत. ४०० पार आकडा घेऊन जाताना इंदापूर तालुक्यातही मोठे काम झाले पाहिजे. मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावायची आहेत. कुणी फोन करतील, कुणाला आठवणी येतील, पूर्वीच्या गोष्टींना उजाळा देतील. त्यात कितपत लक्ष द्यायचे हे तुम्ही ठरवा. विरोधी पक्षाकडून डिवचवण्याचा आणि फूट पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतील. २ महिने कार्यकर्त्यांनी दक्ष राहा. कुठेही फूट पाडू नका. पक्षीय मतभेद विसरून मतदारसंघातील कामे करण्यासाठी मी पुढाकार घेईन. भूतकाळात काय घडले ते सोडून द्या. एकदिलाने तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार