शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

बारामतीतील 'ते' व्हायरल पत्र, ज्यावरून पवार कुटुंबात मतभेद समोर आले; काय लिहिलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 14:33 IST

एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. 

पुणे - अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. विशेषत: पवार कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या बारामतीत आता पवारविरुद्ध पवार अशी लढाई होण्याची चिन्हे आहेत. त्यात बारामतीत एक निनावी पत्र व्हायरल झालं असून त्यातून अजित पवारांवर थेट निशाणा साधण्यात आला आहे. 

व्हायरल झालेल्या या पत्रावर रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांना थेट भावना व्यक्त करता येत नाहीत ते अशाप्रकारे पत्रामाध्यमातून भावना व्यक्त करतात. मला दोनवेळा शरद पवारांनी राजकारणात येण्यापासून रोखले नाहीतर आज जे घडतंय त्याची सुरुवात तेव्हाच झाली असती असं राजेंद्र पवार म्हणाले. 

तर आमच्या कुटुंबात जे काही महत्त्वाचे मोठे निर्णय होतात ते सर्व कुटुंबाच्या विचाराने घेतले जातात. माझे लग्न ठरले तेव्हा काका बापूसाहेब पवार सर्वच विधीत सहभागी होते, माझे कन्यादान प्रताप पवारांनी केले, लग्नाचे कार्ड अप्पासाहेब पवारांच्या नावाने गेले. त्यामुळे कुठलेही महत्त्वाचे निर्णय होतात, मलाही राजकारणात येण्यासाठी कौटुंबिक बैठक झाली त्यातून निर्णय झाला. एखाद्याला कधीतरी एक पाऊल पुढे मागे घ्यावे लागते. तोदेखील त्याग कुटुंबातील अनेकांनी केला आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप प्रिय आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. 

काय लिहिलंय 'त्या' व्हायरल पत्रात?

अजितदादा पवारांनी हे प्रकरण विनाकारण भाव भावकीच्या तालावर आणून ठेवलंय. पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं. स्व. शारदाताई पवार या त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अप्पासाहेब पवार ( रोहित पवारांचे आजोबा ) आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेकापचं काम करू लागले. पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि अप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला. पुढची पिढी जेव्हा तयार होती तेव्हा स्व. अनंतरावांचा मुलगा अजित आणि अप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचे याबाबत विचार होत होता. तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असूनही अजित पवारांना पुढे केले. 

दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून देखील घेतले तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही. पुढचा इतिहास माहितच आहे. पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशीवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणून सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, एक बारामतीकर अशा उल्लेखाने हे पत्र सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहे.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस