शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादीपुरता मर्यादित; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:52 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुद्द्यांचे राजकारण झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

नागपूर - Prakash Ambedkar on NCP ( Marathi News ) केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेला निकाल हा त्या पक्षापुरता मर्यादित आहे. त्याचा आघाडीवर किंवा बाहेर काही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 

नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह गेलंय, परंतु शरद पवार आहे तिथेच आहे. वरचढ कोण असेल यात मी जात नाही. पण आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू होत नाही तोपर्यंत वर्चस्व कोणाचे होईल सांगता येत नाही. निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादी पुरता मर्यादित आहे. त्याच्याबाहेर परिणाम होणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीदरम्यान मुद्द्यांचे राजकारण झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची जी बैठक झाली. त्यात भाजपा सरकार घालवणार असा आपला हेतू असला. त्यात उद्या यशस्वी झालो तर पुढचा कार्यक्रम काय याबाबत चर्चा आणि महत्त्वाचा मसुदा बैठकीत सादर केला. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पुढच्या बैठका सुरू होतील. जागावाटपाची चर्चा अजून सुरू झाली नाही. आम्ही कुठलीही मागणी केली नाही असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, राजकीय परिस्थितीत जर तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का असा प्रश्न पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना केला. त्यावर मला बऱ्याचदा पदांची ऑफर आली आणि मी ती नाकारली. मला रस्त्यावरचं जगणं आवडतं. कैदीत जगणं आवडत नाही. मी अगोदरपासून ऑफर नाकारत आलोय असं त्यांनी स्पष्ट केले. तर मागील ५ वर्ष ईव्हीएमबाबत मी कोर्टात लढतोय. आता हळूहळू इतर येतायेत. कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे दबाव टाकायला हवा. ईव्हीएममधून निघणाऱ्या VVPAT ची मोजणी व्हायला हवी अशी मागणी आंबेडकरांनी केली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार