शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:57 IST

अजित पवार यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे.

रायगड : विधानसभा निवडणूक झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने विरोधकांना अस्मान दाखवलं. या निकालाचे पडसाद देशभर उमटत असून भाजपच्या विजयामुळे एनडीएला पाठिंबा जाहीर केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीला खोचक टोला लगावला आहे.

"इंडिया-इंडिया करणारे जे आहेत, ते आता ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाला, अशा पद्धतीचं बोलायला सुरुवात करतील. पण त्यात काहीही तथ्य नाही. लोकांनी पंतप्रधान मोदींकडे बघून भाजपला पाठिंबा दिला आहे. या विजयाबद्दल मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सगळ्यांचं अभिनंदन करतो," अशी प्रतिक्रिया श्रीवर्धन येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी दिली आहे.

'मला अमितभाईंनी तेव्हाच सांगितलं होतं...' 

भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना अजित पवार म्हणाले होते की, "विधानसभा निवडणुकांचा आज लागलेला निकाल अनपेक्षित नाही. मध्यंतरी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होता. तेव्हा अमितभाईंनी सांगितलं होतं की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा निकाल चांगला लागेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या देशाची प्रगती होत आहे. जागतिक पातळीवरील भारताचा नावलौकिक वाढला आहे. जगभरातील विविध ठिकाणी भारताचे लोक अडकल्यानंतर कौशल्य वापरून पंतप्रधान मोदी त्या लोकांना भारतात आणतात. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये देशाचा वेगाने विकास होत आहे. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या विकासाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या जनतेने कौल दिला आहे. तेलंगणात पण रेवंत रेड्डी म्हणून जी व्यक्ती आहे, ते आधी अभाविपचा कार्यकर्ता होते. त्यांना काँग्रेसने आपल्याकडे खेचल्यामुळे तिथं वेगळा निकाल लागला. ते जर काँग्रेसमध्ये गेले नसते तर तेलंगणातही वेगळं चित्र दिसलं."

दरम्यान, तेलंगणात काँग्रेसने केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव केला आहे. तेलंगणाच्या निकालाबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, "तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातही जाहिरात देत होते. महाराष्ट्रातील अनेक माजी आमदार त्यांनी पक्षात घेतले. तसंच शेती, पाण्याविषयी आम्ही  अनेक योजना राबवत असल्याच्या त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये वाचायला मिळत होत्या. मात्र लोकांनी त्यांना नाकारलं. जनता जनार्दन सर्वस्व असते. आपण कितीही प्रचार केला, काहीही सांगितलं तरी जनता त्यांच्या मनात असतं तेच करते," असं अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३