शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

भाजपच्या विजयाने अजित पवार भलतेच खूश; इंडिया आघाडीला लगावला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:57 IST

अजित पवार यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे.

रायगड : विधानसभा निवडणूक झालेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने विरोधकांना अस्मान दाखवलं. या निकालाचे पडसाद देशभर उमटत असून भाजपच्या विजयामुळे एनडीएला पाठिंबा जाहीर केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच खूश झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीला खोचक टोला लगावला आहे.

"इंडिया-इंडिया करणारे जे आहेत, ते आता ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाला, अशा पद्धतीचं बोलायला सुरुवात करतील. पण त्यात काहीही तथ्य नाही. लोकांनी पंतप्रधान मोदींकडे बघून भाजपला पाठिंबा दिला आहे. या विजयाबद्दल मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह सगळ्यांचं अभिनंदन करतो," अशी प्रतिक्रिया श्रीवर्धन येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी दिली आहे.

'मला अमितभाईंनी तेव्हाच सांगितलं होतं...' 

भाजपच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना अजित पवार म्हणाले होते की, "विधानसभा निवडणुकांचा आज लागलेला निकाल अनपेक्षित नाही. मध्यंतरी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होता. तेव्हा अमितभाईंनी सांगितलं होतं की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा निकाल चांगला लागेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या देशाची प्रगती होत आहे. जागतिक पातळीवरील भारताचा नावलौकिक वाढला आहे. जगभरातील विविध ठिकाणी भारताचे लोक अडकल्यानंतर कौशल्य वापरून पंतप्रधान मोदी त्या लोकांना भारतात आणतात. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये देशाचा वेगाने विकास होत आहे. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या विकासाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या जनतेने कौल दिला आहे. तेलंगणात पण रेवंत रेड्डी म्हणून जी व्यक्ती आहे, ते आधी अभाविपचा कार्यकर्ता होते. त्यांना काँग्रेसने आपल्याकडे खेचल्यामुळे तिथं वेगळा निकाल लागला. ते जर काँग्रेसमध्ये गेले नसते तर तेलंगणातही वेगळं चित्र दिसलं."

दरम्यान, तेलंगणात काँग्रेसने केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव केला आहे. तेलंगणाच्या निकालाबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, "तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातही जाहिरात देत होते. महाराष्ट्रातील अनेक माजी आमदार त्यांनी पक्षात घेतले. तसंच शेती, पाण्याविषयी आम्ही  अनेक योजना राबवत असल्याच्या त्यांच्या जाहिराती पेपरमध्ये वाचायला मिळत होत्या. मात्र लोकांनी त्यांना नाकारलं. जनता जनार्दन सर्वस्व असते. आपण कितीही प्रचार केला, काहीही सांगितलं तरी जनता त्यांच्या मनात असतं तेच करते," असं अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३