शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज?; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 12:38 IST

मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले.

मुंबई - दिल्लीत राष्ट्रवादीचं २ दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही. मला बोलण्याची संधी दिली परंतु वेळेअभावी बोलता आले नाही. केवळ मी नाही तर सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि ५-६ जणांना भाषण करता आले नाही. शरद पवारांचे ३ वाजता समारोपाचं भाषण सुरू होणार होते. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही अस सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीवर खुलासा केला आहे. 

अजित पवार म्हणाले की, पक्षाने मला उपमुख्यमंत्रिपद दिले, विरोधी पक्षनेतेपद दिले. मी नाराज कशाला होऊ? राष्ट्रवादीने मला कधी डावललं नाही. मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांसमोर आहे. मी २१ वर्षात राष्ट्रीय पातळीवर जातो परंतु कुठे भाष्य करत नाही. राज्यात अधिवेशन असलं, कार्यक्रम असलं तर मी भाषण करतो. तुमचे गैरसमज दूर करून राज्यासमोरील प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे असं त्यांनी म्हटलं. 

लम्पी आजारावर सरकारनं भूमिका मांडावीराज्यात जनावारांमध्ये लम्पी स्किन फैलावत आहे. जनावरं दगावली तर त्याचा शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार आहे. मार्च २०२० मध्ये गडचिरोली हा आजार पहिल्यांदा आला. आता राज्यात अनेक भागात रोग पसरतोय. यावर राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्यात आणि लोकांमधील संभ्रमावस्था दूर करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.  १६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी साखर कारखाने सुरू करण्याबाबत बैठक आयोजित केली. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात बैल वाहतुकीने ऊस आणला जातो. बैलावर लम्पी आजार फोफावला तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. सरकारने या संकटाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. लोकांमध्ये जागरुकता आणली पाहिजे. खबरदारी काय घ्यायची याचं पत्रक काढावं असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण झाले पाहिजे. त्यात बैल, गाय आणि ४ वर्षावरील खोंडांचं लसीकरण झाले पाहिजे. केंद्राकडून लस कमी प्रमाणात येत असेल तर परदेशातून लस मागवा परंतु शेतकऱ्यांच्या जनावरांना संकटातून बाहेर काढलं पाहिजे अशीही मागणी अजित पवारांनी केली. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमवावी लागणं हे दुर्देवतसेच औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांना हजर राहण्याबाबत पत्रक काढून आदेश देण्यात आले. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतंय. अंगणवाडी सेविकांना सभेला बोलावलं तर मुलांकडे लक्ष कोण देणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांला गर्दी जमवण्यासाठी अशाप्रकारे आदेश काढले जात असतील तर हे दुर्देव आहे. आता सत्ताधारी म्हणतील परस्पर हे पत्रक काढलं गेले. परंतु आम्हीही सरकारमध्ये होतो असं परस्पर कुणी पत्रक काढत नाही असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. 

२ महिने जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीराज्यात नवं सरकार आल्यानंतर कॅबिनेट विस्तार करायला विलंब केला. त्यानंतर आता जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री नेमले नाहीत. आमदारांमध्ये नाराजी वाढेल यासाठी मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पुढे ढकलला जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या संकटाकडे लक्ष द्यायचं कुणी? १६ जिल्ह्यात झेंडावंदन करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेमावं लागलं. सरकारच्या या कारभाराचा मी धिक्कार करतो असं सांगत अजित पवारांनी घणाघात केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस