शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज?; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 12:38 IST

मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले.

मुंबई - दिल्लीत राष्ट्रवादीचं २ दिवसीय अधिवेशन पार पडलं. अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय नेत्यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही. मला बोलण्याची संधी दिली परंतु वेळेअभावी बोलता आले नाही. केवळ मी नाही तर सुनिल तटकरे, वंदना चव्हाण आणि ५-६ जणांना भाषण करता आले नाही. शरद पवारांचे ३ वाजता समारोपाचं भाषण सुरू होणार होते. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नाही अस सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीवर खुलासा केला आहे. 

अजित पवार म्हणाले की, पक्षाने मला उपमुख्यमंत्रिपद दिले, विरोधी पक्षनेतेपद दिले. मी नाराज कशाला होऊ? राष्ट्रवादीने मला कधी डावललं नाही. मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांसमोर आहे. मी २१ वर्षात राष्ट्रीय पातळीवर जातो परंतु कुठे भाष्य करत नाही. राज्यात अधिवेशन असलं, कार्यक्रम असलं तर मी भाषण करतो. तुमचे गैरसमज दूर करून राज्यासमोरील प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे असं त्यांनी म्हटलं. 

लम्पी आजारावर सरकारनं भूमिका मांडावीराज्यात जनावारांमध्ये लम्पी स्किन फैलावत आहे. जनावरं दगावली तर त्याचा शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार आहे. मार्च २०२० मध्ये गडचिरोली हा आजार पहिल्यांदा आला. आता राज्यात अनेक भागात रोग पसरतोय. यावर राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्यात आणि लोकांमधील संभ्रमावस्था दूर करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.  १६ तारखेला मुख्यमंत्र्यांनी साखर कारखाने सुरू करण्याबाबत बैठक आयोजित केली. कारखान्यावर मोठ्या प्रमाणात बैल वाहतुकीने ऊस आणला जातो. बैलावर लम्पी आजार फोफावला तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. सरकारने या संकटाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. लोकांमध्ये जागरुकता आणली पाहिजे. खबरदारी काय घ्यायची याचं पत्रक काढावं असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण झाले पाहिजे. त्यात बैल, गाय आणि ४ वर्षावरील खोंडांचं लसीकरण झाले पाहिजे. केंद्राकडून लस कमी प्रमाणात येत असेल तर परदेशातून लस मागवा परंतु शेतकऱ्यांच्या जनावरांना संकटातून बाहेर काढलं पाहिजे अशीही मागणी अजित पवारांनी केली. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमवावी लागणं हे दुर्देवतसेच औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांना हजर राहण्याबाबत पत्रक काढून आदेश देण्यात आले. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतंय. अंगणवाडी सेविकांना सभेला बोलावलं तर मुलांकडे लक्ष कोण देणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांला गर्दी जमवण्यासाठी अशाप्रकारे आदेश काढले जात असतील तर हे दुर्देव आहे. आता सत्ताधारी म्हणतील परस्पर हे पत्रक काढलं गेले. परंतु आम्हीही सरकारमध्ये होतो असं परस्पर कुणी पत्रक काढत नाही असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. 

२ महिने जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीराज्यात नवं सरकार आल्यानंतर कॅबिनेट विस्तार करायला विलंब केला. त्यानंतर आता जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री नेमले नाहीत. आमदारांमध्ये नाराजी वाढेल यासाठी मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पुढे ढकलला जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या संकटाकडे लक्ष द्यायचं कुणी? १६ जिल्ह्यात झेंडावंदन करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेमावं लागलं. सरकारच्या या कारभाराचा मी धिक्कार करतो असं सांगत अजित पवारांनी घणाघात केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस