उद्धवनी टुरटुर करू नये - अजित पवार
By Admin | Updated: July 22, 2014 01:29 IST2014-07-22T01:29:04+5:302014-07-22T01:29:04+5:30
उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात एक संस्था काढली नाही, मात्र वस्तुस्थितीची माहिती न घेता ते पवार कुटुंबीयांवर आणि विद्या विकास प्रतिष्ठानवर आरोप करीत आहेत,

उद्धवनी टुरटुर करू नये - अजित पवार
सोलापूर : उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात एक संस्था काढली नाही, मात्र वस्तुस्थितीची माहिती न घेता ते पवार कुटुंबीयांवर आणि विद्या विकास प्रतिष्ठानवर आरोप करीत आहेत, त्यांनी जादा टुरटुर करू नये, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी लगावला़ उद्धव ठाकरे रविवारी सोलापूर दौ:यावर असताना त्यांनी बार्शीतील सभेत विद्या प्रतिष्ठानवर टीका केली होती, त्याला अजित पवार यांनी उत्तर दिल़े
पवार म्हणाले, एकतर आम्ही कधीही शासकीय जागा घेत नाही़ कुठेही नाममात्र दराने जागा घेतल्या नाहीत, विद्या प्रतिष्ठानची जागा रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून योग्य ती शासकीय रक्कम भरून घेतली आह़े या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण दिले जाते, शिवाय कोणाकडूनही डोनेशन घेतले जात नाही़
विरोधकांनी काही काम करायचे नाही, केवळ ओरड करायची. विरोधकांनी विकासावर बोलावे, कोणाला तुच्छ समजून समाजात
तेढ निर्माण होईल असे काही
बोलू नये, असेही ते म्हणाल़े (प्रतिनिधी)
मी आइसक्रीम खात नाही
औरंगाबादला मला आइसक्रीम मिळाले नाही म्हणून दोघांचे निलंबन, आयला माझी एवढी वाईट अवस्था झाली का? मी दौ:यात कधी आइसक्रीम खात नाही. गाडीत किंवा हेलिकॉप्टरमधून फिरताना भाजीभाकरी खातो. चुकीच्या बातम्या कोण पसरवतोय हे कळत नाही. माङया बदनामीची तुम्ही सुपारी घेतली काय, असा सवाल त्यांनी पत्रकार कक्षाकडे पाहून केला.
144 जागा हव्यात
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 144 जागा लढविण्यासाठी आग्रही आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी निर्धार मेळाव्यात सांगितले. तटकरे म्हणाले, सतत तिस:या वर्षी राज्यात दुष्काळी स्थिती आहे. देशातील अनेक राज्यांत हे चित्र असताना देशाच्या कृषिमंत्र्यांना अजून या स्थितीची माहिती नाही. हे सरकार शेतक:यांचे नसल्याचे तटकरे म्हणाले.