शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ajit Pawar Devendra Fadnavis: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सुरू असताना घरात वातावरण कसं होतं? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 20:22 IST

अजित पवार यांनी फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानंतर राजकीय जाणकारांनाही धक्का बसला होता

Ajit Pawar Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात नुकताच एक मोठा भूकंप झाला. सुरूवातीला राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. या बंडखोरीला शिवसेनेच्या इतर आमदारांचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे सुमारे ५० आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात सत्तास्थापना केली. असाच एक बंडखोरीचा प्रयत्न २०१९ मध्ये झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तास्थापना केली होती. याच संदर्भातील एका गोष्टीबाबतचा खुलासा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.

हल्ली अनेक नवनवीन शो मराठी वाहिनींवर येत असतात. झीमराठीवर आता ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमाबाबत सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चा रंगल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमाचा एक छोटासा टिजर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अभिनेता सुबोध याने ट्वीट केला. त्यात खासदार सुप्रिया सुळे या पाहुण्या म्हणून उपस्थित असल्याचे दिसले. यावेळी तेथे हजर असलेल्या काही महिलांनी सुप्रिया सुळे यांना काही प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता की, जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शपथ घेतली, त्यावेळी तुमच्या घरातील वातावरण कसे होते? त्यावर सुप्रिया सुळे यांनी अतिशय मजेशीर पणे उत्तर दिले की, त्यावेळी मी झोपेत होते. पाहा तो धमाल व्हिडीओ-

दरम्यान, २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी पहाटे भाजपा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट यांनी मिळून सरकार स्थापन केले होते. या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी जेव्हा शपथ घेतली त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते. या स्टेटसमध्ये त्यांनी अतिशय भावनिक मेसेज लिहिला होता. सुरूवातीला "पक्षात आणि कुटुंबाच फूट", असा एक स्टेटस ठेवला होता. तर दुसऱ्या स्टेटसमध्ये लिहिले होते, "तुम्ही आयुष्यात कोणावर विश्वास ठेवता... आयुष्यात माझी इतकी फसवणूक कधीही झाली नव्हती... त्यांची (अजितदादा) बाजू घेतली, त्यांच्यावर प्रेम केलं.. पण त्या बदल्यात काय मिळालं पाहा", असे सुप्रिया सुळे यांनी लिहिले होते. असे असताना अजित दादा दीड दिवसांतच फडणवीसांच्या सरकारमध्ये राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडे आले होते. त्यानंतर ते महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्री होते.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ