शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे.

कर्जत : राजकारणाच्या वेळी राजकारण करा. पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण करू नका. प्रफुल्ल पटेल यांनी काल अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. एकदा नाही, अनेकदा युतीसोबत जाण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे सर्व खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा १९९९ चाच आहे. आम्ही भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा सोडलेली नाही. तुम्ही चार-चार वेळा बोलणी केली. आघाडी करण्याचा शब्द दिला आणि ऐनवेळी माघारी फिरले. ते चालते आम्ही भाजपसोबत गेलो, ते का चालत नाही? आम्ही आमचा पक्ष सोडला नाही. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानेच जाणार आहोत. नितिश कुमार, जयललिता, मेहबूबा मुफ्तींनी पक्ष बदलला, पण विचार बदलला का? अडीच वर्ष शिवसेनेसोबत होतो, पण विचारधारा बदलली का? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत क्रमांक दोनचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) राहिला आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत आहे. त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच पक्षाचे नाव आहे. त्यामुळे गावपाळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणावे लागतील. अडचणीत आलेल्या लोकांसाठी आपण मदत केली पाहिजे. अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले. अजित दादांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, कर्जतमध्ये छगन भुजबळांना मराठा आंदोलकांनी विरोध दर्शविला होता. यादरम्यान आंदोलकांकडून 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. नाशिकमध्ये गारांच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. त्यांचे अश्रू पुसायला जाणे माझे कर्तव्य होते. पण काहीजण चले जाओ चले जाओ करत होते. गावबंदी असल्याचे सांगून मला प्रवेश दिला जात नव्हता. पण काहींना प्रवेश दिला जातो. त्यामुळे राजकारण कोण करतंय हे आम्हाला माहीत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. दोन समाजात वाद निर्माण करण्याचे षड्यंत्र कोणाचे, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. मराठा समाजाने ५८ मूकमोर्चे काढले, त्यांचा आवाज त्या-त्या वेळेच्या सरकारांपर्यंत गेला. पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणासाठी एक कायदा पास केला. तो फेल गेला. फडणवीस सरकारने एक कायदा पास केला, तोही फेल गेला. पण म्हणून सरकार थांबले नाही, त्यांनी काम सुरु ठेवले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस