शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे.

कर्जत : राजकारणाच्या वेळी राजकारण करा. पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण करू नका. प्रफुल्ल पटेल यांनी काल अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. एकदा नाही, अनेकदा युतीसोबत जाण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कर्जत येथे कालपासून दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे सर्व खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा १९९९ चाच आहे. आम्ही भाजपसोबत गेलो असलो तरी विचारधारा सोडलेली नाही. तुम्ही चार-चार वेळा बोलणी केली. आघाडी करण्याचा शब्द दिला आणि ऐनवेळी माघारी फिरले. ते चालते आम्ही भाजपसोबत गेलो, ते का चालत नाही? आम्ही आमचा पक्ष सोडला नाही. आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानेच जाणार आहोत. नितिश कुमार, जयललिता, मेहबूबा मुफ्तींनी पक्ष बदलला, पण विचार बदलला का? अडीच वर्ष शिवसेनेसोबत होतो, पण विचारधारा बदलली का? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत क्रमांक दोनचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) राहिला आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्यासोबत आहे. त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याच पक्षाचे नाव आहे. त्यामुळे गावपाळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणावे लागतील. अडचणीत आलेल्या लोकांसाठी आपण मदत केली पाहिजे. अजितदादा स्वार्थासाठी नाही, तर विकासासाठी सत्तेत गेले. अजित दादांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि आम्ही त्याच मार्गाने जाणार आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, कर्जतमध्ये छगन भुजबळांना मराठा आंदोलकांनी विरोध दर्शविला होता. यादरम्यान आंदोलकांकडून 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या. याबाबतही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. नाशिकमध्ये गारांच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. त्यांचे अश्रू पुसायला जाणे माझे कर्तव्य होते. पण काहीजण चले जाओ चले जाओ करत होते. गावबंदी असल्याचे सांगून मला प्रवेश दिला जात नव्हता. पण काहींना प्रवेश दिला जातो. त्यामुळे राजकारण कोण करतंय हे आम्हाला माहीत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. दोन समाजात वाद निर्माण करण्याचे षड्यंत्र कोणाचे, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. मराठा समाजाने ५८ मूकमोर्चे काढले, त्यांचा आवाज त्या-त्या वेळेच्या सरकारांपर्यंत गेला. पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा आरक्षणासाठी एक कायदा पास केला. तो फेल गेला. फडणवीस सरकारने एक कायदा पास केला, तोही फेल गेला. पण म्हणून सरकार थांबले नाही, त्यांनी काम सुरु ठेवले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस