शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

“मनोज जरांगे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नेता, राजकारणात यायचा विचार करावा”: इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 13:45 IST

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: विधानसभा, लोकसभेत आपल्या विचारांचे लोक पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे जलील यांनी म्हटले आहे.

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: महाराष्ट्रात आजच्या घडीला सर्वांत मोठा नेता कोणता असेल तर मनोज जरांगे पाटील आहे. मनोज जरांगे यांची समाजासाठीची तळमळ, प्रामाणिकता पाहून समाज त्यांच्याकडे आकृष्ट झालेला आहेत. स्टंट करणाऱ्या नेत्यांना जनता लगेच ओळखते. पण मनोज जरांगे कोणताही स्टंट न करता समाजाचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घेत आहे. मराठा समाजाने जरांगे पाटील यांना आपला नेता मानले आहे. मनोज जरांगे यांनी राजकारणात यायचा विचार करावा, असे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. 

आपल्या विचारांचे लोक विधानसभा, लोकसभेत पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, हे माझ्या मुस्लीम समाजाला नेहमीच सांगत असतो. गल्लीत कायदे बनत नाहीत, त्यासाठी सभागृहातच जावे लागते. मनोज जरांगे यांनाही हाच सल्ला देईन. त्यांनी याचा विचार करावा. लोक टीका करतील, पण त्याचा विचार त्यांनी करू नये. कारण आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर ते विधानसभा आणि संसदेतूनच होईल. जरांगे पाटील यांनी कितीही तीव्र आंदोलन केले तरी निर्णय सरकारच घेणार आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही

मराठा समाजाचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची भेट घेतली, तेव्हा ते कशाप्रकारे आश्वासन देत होते. आपण सर्वांनी पाहिले. पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही, राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ते निवडणुका जाहीर करू शकतात. तेव्हा राज्य सरकार सांगेल की, आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षण देता येणार नाही. अनेक समाजांना गेल्या कित्येक वर्षांपासून असेच मुर्खात काढण्यात आलेले आहे, या शब्दांत जलील यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आमचा मार्ग राजकारण नाही. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षण मिळाले पाहिजे. ही पोरे मोठी झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते. नेमका आमचा राजकारणानेच घात केलाय. जनचळवळीत इतकी ताकद आहे की ते आता सिद्ध झाले आहे. लोकांचा समज होता की, आंदोलनाने काही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता. गरिबांचे कामच नाही की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणे. परंतु, याच आंदोलनामुळे ५६ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जलील यांच्या आवाहनावर दिली.

 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील