शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नेता, राजकारणात यायचा विचार करावा”: इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 13:45 IST

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: विधानसभा, लोकसभेत आपल्या विचारांचे लोक पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे जलील यांनी म्हटले आहे.

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: महाराष्ट्रात आजच्या घडीला सर्वांत मोठा नेता कोणता असेल तर मनोज जरांगे पाटील आहे. मनोज जरांगे यांची समाजासाठीची तळमळ, प्रामाणिकता पाहून समाज त्यांच्याकडे आकृष्ट झालेला आहेत. स्टंट करणाऱ्या नेत्यांना जनता लगेच ओळखते. पण मनोज जरांगे कोणताही स्टंट न करता समाजाचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घेत आहे. मराठा समाजाने जरांगे पाटील यांना आपला नेता मानले आहे. मनोज जरांगे यांनी राजकारणात यायचा विचार करावा, असे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. 

आपल्या विचारांचे लोक विधानसभा, लोकसभेत पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, हे माझ्या मुस्लीम समाजाला नेहमीच सांगत असतो. गल्लीत कायदे बनत नाहीत, त्यासाठी सभागृहातच जावे लागते. मनोज जरांगे यांनाही हाच सल्ला देईन. त्यांनी याचा विचार करावा. लोक टीका करतील, पण त्याचा विचार त्यांनी करू नये. कारण आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर ते विधानसभा आणि संसदेतूनच होईल. जरांगे पाटील यांनी कितीही तीव्र आंदोलन केले तरी निर्णय सरकारच घेणार आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही

मराठा समाजाचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची भेट घेतली, तेव्हा ते कशाप्रकारे आश्वासन देत होते. आपण सर्वांनी पाहिले. पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही, राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ते निवडणुका जाहीर करू शकतात. तेव्हा राज्य सरकार सांगेल की, आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षण देता येणार नाही. अनेक समाजांना गेल्या कित्येक वर्षांपासून असेच मुर्खात काढण्यात आलेले आहे, या शब्दांत जलील यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आमचा मार्ग राजकारण नाही. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षण मिळाले पाहिजे. ही पोरे मोठी झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते. नेमका आमचा राजकारणानेच घात केलाय. जनचळवळीत इतकी ताकद आहे की ते आता सिद्ध झाले आहे. लोकांचा समज होता की, आंदोलनाने काही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता. गरिबांचे कामच नाही की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणे. परंतु, याच आंदोलनामुळे ५६ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जलील यांच्या आवाहनावर दिली.

 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील