शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

'वंचित' वेटिंगवर तर एमआयएमचा उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:09 IST

दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची पुन्हा आघाडी होण्याची शक्यता वतर्वली जात आहे. तर जागांची तडजोड केल्यास आघाडी होऊ शकते, असं संकेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे. मात्र असे असतानाही एमआयएमने एकामागे एक उमेदवार जाहीर करण्याचा धडाकाचं लावला आहे. दुसरीकडे वंचीत बहुजन आघाडीने मात्र यादी जाहीर करण्याचा निर्णय वेटिंगवर ठेवला असल्याचे पाहायला मिळत आहे.

सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचे कारण देत एमआयएमने वंचित बहुजन आघडीसोबत जाणार नसल्याचे आधी जाहीर केले होते. त्यांनतर सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितसोबत आघाडी होईल, असं म्हणत जलील यांनी मनोमिलनाचे संकेत दिले. तर एमआयएमसाठी अजूनही आमचे दार खुले असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

एमआयएमने ११ सप्टेंबरला तीन उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता पुन्हा रविवारी खासदार जलील यांनी चार उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे सन्मानजनक जागा मिळाल्यास 'वंचित'सोबत जाण्याचा दावा एमआयएम करत आहे. तर दुसरीकडे उमेदवार जाहीर करण्याचा धडका सुद्धा जलील यांनी लावला आहे. अशा परिस्थित मात्र प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय अजूनही वेटिंगवर ठेवला असल्याचे दिसत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत, आम्ही २८८ मतदारसंघाची तयारी केली असल्याचा दावा केला आहे. तर एमआयएमकडून ही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, आतापर्यंत ७ उमेदवार जाहीर सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे जरी दोन्ही पक्षातील नेते एकत्र येण्याचे संकेत देत असले तरीही, प्रत्यक्षात तसे होईल याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच एमआयएमने रविवारी सोलापूर मध्य व दक्षिणचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर या मतदारसंघावर वंचितचा दावा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे अंतिम निर्णय काय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.