शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

'वंचित' वेटिंगवर तर एमआयएमचा उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:09 IST

दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची पुन्हा आघाडी होण्याची शक्यता वतर्वली जात आहे. तर जागांची तडजोड केल्यास आघाडी होऊ शकते, असं संकेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे. मात्र असे असतानाही एमआयएमने एकामागे एक उमेदवार जाहीर करण्याचा धडाकाचं लावला आहे. दुसरीकडे वंचीत बहुजन आघाडीने मात्र यादी जाहीर करण्याचा निर्णय वेटिंगवर ठेवला असल्याचे पाहायला मिळत आहे.

सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचे कारण देत एमआयएमने वंचित बहुजन आघडीसोबत जाणार नसल्याचे आधी जाहीर केले होते. त्यांनतर सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितसोबत आघाडी होईल, असं म्हणत जलील यांनी मनोमिलनाचे संकेत दिले. तर एमआयएमसाठी अजूनही आमचे दार खुले असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

एमआयएमने ११ सप्टेंबरला तीन उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता पुन्हा रविवारी खासदार जलील यांनी चार उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे सन्मानजनक जागा मिळाल्यास 'वंचित'सोबत जाण्याचा दावा एमआयएम करत आहे. तर दुसरीकडे उमेदवार जाहीर करण्याचा धडका सुद्धा जलील यांनी लावला आहे. अशा परिस्थित मात्र प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय अजूनही वेटिंगवर ठेवला असल्याचे दिसत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत, आम्ही २८८ मतदारसंघाची तयारी केली असल्याचा दावा केला आहे. तर एमआयएमकडून ही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, आतापर्यंत ७ उमेदवार जाहीर सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे जरी दोन्ही पक्षातील नेते एकत्र येण्याचे संकेत देत असले तरीही, प्रत्यक्षात तसे होईल याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच एमआयएमने रविवारी सोलापूर मध्य व दक्षिणचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर या मतदारसंघावर वंचितचा दावा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे अंतिम निर्णय काय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.