शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'वंचित' वेटिंगवर तर एमआयएमचा उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:09 IST

दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची पुन्हा आघाडी होण्याची शक्यता वतर्वली जात आहे. तर जागांची तडजोड केल्यास आघाडी होऊ शकते, असं संकेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे. मात्र असे असतानाही एमआयएमने एकामागे एक उमेदवार जाहीर करण्याचा धडाकाचं लावला आहे. दुसरीकडे वंचीत बहुजन आघाडीने मात्र यादी जाहीर करण्याचा निर्णय वेटिंगवर ठेवला असल्याचे पाहायला मिळत आहे.

सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचे कारण देत एमआयएमने वंचित बहुजन आघडीसोबत जाणार नसल्याचे आधी जाहीर केले होते. त्यांनतर सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितसोबत आघाडी होईल, असं म्हणत जलील यांनी मनोमिलनाचे संकेत दिले. तर एमआयएमसाठी अजूनही आमचे दार खुले असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

एमआयएमने ११ सप्टेंबरला तीन उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आता पुन्हा रविवारी खासदार जलील यांनी चार उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे सन्मानजनक जागा मिळाल्यास 'वंचित'सोबत जाण्याचा दावा एमआयएम करत आहे. तर दुसरीकडे उमेदवार जाहीर करण्याचा धडका सुद्धा जलील यांनी लावला आहे. अशा परिस्थित मात्र प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय अजूनही वेटिंगवर ठेवला असल्याचे दिसत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत, आम्ही २८८ मतदारसंघाची तयारी केली असल्याचा दावा केला आहे. तर एमआयएमकडून ही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, आतापर्यंत ७ उमेदवार जाहीर सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे जरी दोन्ही पक्षातील नेते एकत्र येण्याचे संकेत देत असले तरीही, प्रत्यक्षात तसे होईल याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच एमआयएमने रविवारी सोलापूर मध्य व दक्षिणचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर या मतदारसंघावर वंचितचा दावा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे अंतिम निर्णय काय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.