शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती का तुटली? ओवेसी म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांनी...” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 14:43 IST

Maharashtra News: एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याचे सांगितले जात असून, ओवेसींनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Maharashtra Politics: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडीमध्ये येण्याचा मानस बोलून दाखवला होता. याबाबत सकारात्मक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही याबाबत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.  उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे म्हणत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने (MIM) युती केली होती. ही युती अलीकडेच तुटल्याचे सांगितले जात आहे. यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया देताना ही युती का तुटली याबाबत स्पष्टच शब्दांत सांगितले. 

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या झालेल्या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. ते आता कसे सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. 

भाजप सत्तेत आहे, तिथे हा असंविधानिक कायदा बनवण्यात आला

लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले की, भारताच्या संविधानानूसार आपल्या आवडीनुसार लग्न करू शकतात. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे तिथे हा घटनाबाह्य कायदा बनवण्यात आला आहे. लव्ह जिहाद म्हणतात पण भाजपमध्ये असे किती लोक आहेत की त्यांनी अशी लग्न केली आहेत. कोणी प्रेम करतेय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादी नजरेतून बघणे योग्य नाही. लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार? अशी विचारणा ओवेसी यांनी केली. 

दरम्यान, आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि इतर खूप मुद्दे आहेत, त्यावर बोला. तरुणांच्या हाताला काम द्या. नोकरीच्या संधी वाढवा. महागाई कमी करा. तुम्हाला फक्त नावाचे पडलेय. नामांतरापेक्षा कामाच्या गोष्टींवर बोला, अशी टीका ओवेसी यांनी भाजपवर केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी